Srinagar-Jammu Air India flight : नवी दिल्ली : प्रवासात विलंब होण्याचा अनुभव तुम्ही नक्कीच घेतला असेल. अनेकवेळा हा विलंब तांत्रिक कारणांमुळे होत असतो. विमान उड्डाणांना (Flight delay) उशीर होण्यास एरवी वेगवेगळी कारणे असतात. विमान प्रवाशांसाठी (Air travel) विलंब होण्याची घोषणा हा एक त्रासदायक प्रकार असतो. मात्र आता एका विचित्र कारणामुळे विमानाला उशीर झाल्याचा प्रसंग घडला आहे. विशेष म्हणजे आता या घटनेची चौकशीदेखील होणार आहे. डीजीसीएने (DGCA) या घटनेच्या चौकशीचे आदेशदेखील दिले आहेत. एका उंदरामुळे (Rat) टाटांच्या एअर इंडियाच्या (Air India Flight) विमानाला तब्बल एक तास उशीर झाला होता. नेमके या उंदरामुळे एअर इंडियाच्या विमानाला कसा उशीर झाला, या उंदराने काय हैदोस घातला होता ते पाहूया. (Air India's Srinagar-Jammu Flight delayed by rat for one hour)
अधिक वाचा : IEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार!
झाले असे की टाटा समूहाची (Tata Group) मालकी असणाऱ्या एअर इंडियामध्ये (Air India)एक विचित्र प्रसंग घडला. या विचित्र घटनेत, टाटाच्या मालकीचे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी एक तासापेक्षा जास्त उशीर झाले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, श्रीनगर (SXR) विमानतळावरून उड्डाण करण्यापूर्वी विमानात उंदीर आढळल्याने श्रीनगर-जॅमी एअर इंडिया AI-822 ला विलंब झाला. उंदीर किंवा कीटकाने एअर इंडियाच्या विमानाला उशीर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, दिल्ली-नेवार्क आंतरराष्ट्रीय उड्डाणाच्या मध्यभागी एक वटवाघूळ सापडले होते आणि विमानाच्या पायलटने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत जाण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांना दुसऱ्या विमानात हलवण्यात आले आणि वन्यजीव अधिकारी विमानातून जनावराचा फक्त मृतदेह बाहेर काढू शकतात.
अधिक वाचा : PM Awas Yojana | जेव्हा पीएम आवास योजनेअंतर्गत घर मिळाल्यावर एका गरीब व्यक्तीने पंतप्रधानांना लिहिलं पत्र...
विमान उड्डाणांच्या वेळापत्रकानुसार, श्रीनगरला जाणारे विमान श्रीनगरमधील शेख उल-आलम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी 2:15 वाजता उड्डाण करणार होते. परंतु एक तासाच्या विलंबानंतर त्या विमानाचे दुपारी 3:20 च्या सुमारास उड्डाण करण्यात आले.एअर इंडियाच्या एआय-८२२ विमानात उंदीर आढळल्याने श्रीनगरहून जम्मूला जाणाऱ्या विमानाला उशीर झाला. विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिली आहे.
टाटा समूहाने एअर इंडिया ताब्यात घेतल्याने, पूर्वीच्या सरकारी मालकीच्या एअर इंडियाच्या विमानसेवेत आणि विमानांच्या स्थिती कालांतराने सुधारणा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशातंर्गत विमानसेवा (Domestic aviation industry)आता पुन्हा गती पकडू लागली आहे. पहिला लॉकडाऊन (Lockdown)लागू झाल्यानंतर दोन वर्षांनी प्रवासी वाहतूक कोविडपूर्व पातळीपर्यंत पोहोचल्याने भारताचा देशांतर्गत हवाई उद्योग पुन्हा एकदा भरभराटीला येत आहे. कोरोना महामारीचे संकट आटोक्यात आल्याने निश्वास सोडलेल्या नागरिकांनी आता पुन्हा प्रवास करण्यास जोरदार सुरूवात केली आहे. त्याचाच परिणाम देशातील विमान प्रवासात दिसून येतो आहे.
आता देशांतर्गत विमान प्रवास करताना आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR test) अनिवार्य असणार नाही. मागील दोन वर्षांमध्ये देशातील हवाई प्रवाशांची दररोजची संख्या प्रथमच 4 लाख प्रवाशांवर पोचली आहे. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic)संकटाचा फटका बसलेला हवाई वाहतूक उद्योग (aviation industry) झेप घेत असल्याचेच हे चिन्ह आहे.