7th pay commission update : नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकार लवकरच फिटमेंट फॅक्टर वाढवू शकते. यानंतर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18000 वरून 26,000 (केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन) वाढवले जाऊ शकते. 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्या अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय कर्मचार्यांचे फिटमेंट फॅक्टर ठरवले जाण्याची शक्यता आहे. हा खर्च आगामी 2022-23 च्या अर्थसंकल्पात समाविष्ट केला जाऊ शकतो. (Central Government Employees may get Basic salary hike before Republic day)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रातील मोदी सरकार 26 जानेवारी 2022 पूर्वी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. याअंतर्गत कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवला जाऊ शकतो, फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे, किमान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर अंतर्गत पगार मिळत आहे. फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवण्याची युनियनची मागणी आहे. फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्के असल्यास, 8,000 रुपयांच्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26,000 रुपये होईल.
या संदर्भात केंद्र सरकारची कर्मचारी संघटनेसोबत लवकरच एक मोठी बैठक होऊ शकते, ज्यामध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. जर सरकारी कर्मचाऱ्याचा किमान पगार 18,000 रुपये असेल, तर त्याला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार सर्व भत्ते वगळून 46,260 रुपये (18,000 X 2.57 = 46,260) पगार मिळेल. जेव्हा फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल, तेव्हा तोच पगार 95,680 रुपये असेल (26000X3.68 = 95,680). (हे अंदाजानुसार दाखवले आहे, ते बदलू शकते.) याआधी 2016 मध्ये शेवटच्या वेळी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्यात आली होती, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 6,000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले होते. तो आता पुन्हा एकदा वाढवण्याच्या तयारीत आहे. आम्ही तुम्हाला सांगूया की फिटमेंट फॅक्टरमुळे केंद्रीय कर्मचार्यांचा पगार अडीच पटीने वाढतो, जो पगार भत्त्यांव्यतिरिक्त त्यांच्या बेसिक पे आणि फिटमेंट फॅक्टरने ठरवला जातो.
केंद्राने आणखी एक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कॉम्पोझिट ट्रान्सफर ग्रॅंट म्हणजे सीटीजीवरील (CTG)मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याच्या निर्णयाचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. या मर्यादेत निवृत्त होणारा कर्मचाऱ्याला जर ड्युटीच्या शेवटच्या स्टेशनवर किंवा शेवटच्या स्टेशनपासून २० किमी अंतरापेक्षा जास्त नसलेल्या स्थायिक व्हायचे असेल तर त्याला एक तृतियांश सीटीजीची दिला जात होता. आत्तापर्यंत, कर्मचाऱ्याला ड्युटीच्या शेवटच्या स्टेशनवर किंवा ड्युटीच्या शेवटच्या स्टेशनपासून 20 किमीपेक्षा जास्त अंतरावर नसलेल्या स्टेशनवर स्थायिक व्हायचे असेल तर CTG च्या एक तृतीयांश रक्कम स्वीकारली जात होती. सरकारने आता कर्तव्याच्या शेवटच्या स्थानकापासून २० किमी अंतराची अट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.