PM Kisan Yojana : नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु आज आपण सरकारच्या अशा योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपये दिले जातील. ही योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Yojana)आहे. तुम्हीही शेतकरी असाल आणि पैशांची गरज असेल तर तुम्ही काही मिनिटांत या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता. (Government scheme for farmers, can get benefit of Rs 1.6 lakhs, check details)
अधिक वाचा : विधानसभेच्या पुढील निवडणुका कधी, राज ठाकरेंनी सांगितला महिना
तुमच्या माहितीसाठी पीएम किसान व्यतिरिक्त, किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Yojana) सरकारने सुरू केली आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला कृषी कर्जाचा लाभ मिळतो. हे कर्ज तुम्ही घरी बसून घेऊ शकता. विशेष म्हणजे हे कर्ज तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय मिळते.
यापूर्वी किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत असे. परंतु शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने त्याची रक्कम 1.60 लाखांपर्यंत वाढवली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
अधिक वाचा : Rohit Pawar : आधी बँकेचे पैसे परत करण्यासाठी अभ्यास करा, राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांचा मोहित कंबोजना टोला
केसीसी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात कर्जाची सुविधा द्यावी लागते. याशिवाय सरकार किसान क्रेडिट कार्ड योजना कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सबसिडीचा लाभही देते. तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास तुम्हाला 3% प्रोत्साहनपर सूट देखील मिळते. त्याच वेळी, क्रेडिट कार्डचे वार्षिक व्याज 4 टक्के आहे.
ज्या शेतकर्याच्या नावावर शेत आहे ते हे कार्ड बनवू शकतात. याशिवाय कार्डसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 75 वर्षांच्या दरम्यान असावे. यासाठी शेतकऱ्याच्या शेतीचे दस्तावेज कोणत्याही बँकेकडे किंवा संस्थेकडे गहाण ठेवलेले नसले पाहिजेत.
अधिक वाचा : Vastu Tips: जेवण करताना या दिशेला तोंड केल्यास बनाल श्रीमंत
अनेकवेळा शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यात आला नसल्याची तक्रार करतात. वास्तविक, योजनेसाठी नोंदणी करताना झालेली चूक हे यामागचे कारण असू शकते. बँक तपशीलापासून टायपिंगपर्यंतच्या चुकांमुळे सन्मान निधी योजनेचे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात येत नाहीत. कधी नावात चूक होते तर कधी तपशील आधार कार्डशी जुळत नाही. अशा परिस्थितीत या योजनेच्या पुढील हप्त्यापासून शेतकरी वंचित राहू शकतात. तथापि, या चुका सुधारण्यासाठी, तुम्ही प्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट देऊन त्या दुरुस्त करू शकता.
सरकारने शेतकर्यांना एक मोठी बातमी दिली आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केले नाही त्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. सरकारने आता ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती.