PM Kisan Samman Nidhi Yojana Latest Updates: नवी दिल्ली : तुम्ही देखील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सरकारने या योजनेत 8 बदल केले आहेत. जर तुम्ही या योजनेंतर्गत तुमचे दस्तऐवज देखील अपडेट केले नाहीत, तर तुमचा समावेश चुकीच्या पद्धतीने पेमेंट घेतल्याच्या बनावट यादीत केला जाईल आणि तुम्हाला आतापर्यंत मिळालेले सर्व हप्ते परत करावे लागतील. यात नेमके काय बदल झाले आहेत आणि तुम्ही काय अपडेट केले पाहिजे त्याची सविस्तर माहिती जाणून घ्या. (PM Kisan Yojana have 8 changes, update your information otherwise you have to return the installments, check details)
अधिक वाचा : Bank Fraud | फसवणूक झाल्यास 90% पैसे 10 दिवसांत वसूल केले जाऊ शकतात, पाहा कसे परत मिळवायचे तुमचे पैसे
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या स्थापनेपासून आतापर्यंत 8 बदल करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचे पैसे आले आहेत. आता 11 व्या हप्त्याचा (PM Kisan 11th installment) लाभ घेण्यासाठी अनेक कागदपत्रे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच लाभार्थ्यांना ई-केवायसी (e-KYC)करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता सरकारने पुन्हा एक बदल केला असून त्याअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जातील. या अंतर्गत, तुम्ही घेत असलेल्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही किंवा तुम्हाला हप्ता परत करावा लागेल हे देखील कळू शकेल.
अधिक वाचा : UPI PIN | तुमच्या युपीआयचा पिन विसरलात? तो कसा मिळवायचा ते पाहा, सोप्या स्टेप्स...
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, अनेक करदाते देखील याचा लाभ घेत आहेत, तर अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे पती-पत्नी दोघेही हप्ता घेत आहेत. या योजनेच्या नियमांनुसार शेत पती-पत्नी दोघांच्या नावावर असले पाहिजे, परंतु ते एकत्र राहत असतील आणि कुटुंबातील मुले अल्पवयीन असतील तर केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल. अशा बनावट शेतकर्यांवर आता सरकारने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून नोटिसाही पाठविल्या जात आहेत.
तुम्हीही अशी काही चूक केली असेल, तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेतलेली रक्कम स्वेच्छेने परत करावी. यासाठी सरकारने पीएम किसान पोर्टलवर सुविधा दिली आहे. त्याची प्रक्रिया जाणून घेऊया.