PM Kisan Latest Update: तुम्हीही पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) लाभार्थी (Beneficiary) असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 11 व्या हप्त्यानंतर आता सरकारने (government) केवायसी अनिवार्य केले आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत या योजनेंतर्गत EKYC केले नसेल, तर ते तात्काळ करा. तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही. केवायसीची अंतिम मुदत वाढविण्यात येणार नाहीये. (Today is an important day for PM Kisan Yojana beneficiaries, do eKYC now, know how to do kyc)
शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. साधरण चार महिन्यानंतर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात सरकार 2 हजार रुपये पाठवत असते. योजना सुरू झाली होती तेव्हा फक्त योजनेत आपलं नाव नोंदणी करायची होती, त्यानंतर शेतकऱ्यांना निधी मिळत असायचा. परंतु गेल्या काही हप्त्यापासून ईकेवायसी करणं सरकारनं बंधनकारक केलं आहे.
Read Also : IND vs HK: हाँगकाँगविरुद्ध सामन्यात पंतला संधी?
केंद्र सरकारने या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी eKYC अनिवार्य केली असून याची मुदत वाढवली होती. पीएम किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in) ही माहिती देण्यात आली आहे. पीएम किसान वेबसाइटवरील फ्लॅशनुसार, 'सर्व PMKISAN लाभार्थ्यांसाठी eKYC अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 आहे'. यापूर्वी त्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 होती. म्हणजेच पुन्हा एकदा त्याची अंतिम मुदत जवळ आली नसून तर ती आजच आहे. पुढील हप्ता हवा असेल हातातील काम सोडा आणि आजच केवायसी करा.
e-KYC शिवाय तुमचा हप्ता अडकू शकतो. पीएम किसान पोर्टलवर असे सांगण्यात आले आहे की, आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना किसान कॉर्नरमधील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. हे काम तुम्ही तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून घरी बसूनही करू शकता.
Read Also : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची कधी होणार प्राणप्रतिष्ठा
eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.
आता पीएम किसान योजनेसाठी eKYC करायची असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला pmkisan.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
ही वेबसाईट उघडल्यावर सगळ्यात वरती तुम्हाला लाल अक्षरात एक सूचना दिसेल. - "eKYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers. OTP Based eKYC is available on PMKISAN Portal. You may also contact nearest CSC centres for Biometric authentication based eKYC. Deadline of eKYC for all the PMKISAN beneficiaries has been extended till 31st August 2022."
याचा अर्थ पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. ओटीपी बेस्ड ई-केवायसीची सुविधा पीएम किसानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. eKYC करण्यासाठीची मुदत 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.
एक म्हणजे जर तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी लिंक असेल तर तुम्ही Aadhar based OTP authentication वापरून eKYC करू शकता. त्यासाठी फार्मर कॉर्नरमधील eKYC या पर्यायावर क्लिक करा. पण, जर तुम्हाला Biometric authentication करायचं असेल, तर जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल.