Bullet Train Ticket Price: नवी दिल्ली : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav)यांनी बुलेट ट्रेनचे (Bullet Train) भाडे फर्स्ट एसीच्या बरोबरीने ठेवण्याचे संकेत दिले आहेत. बुलेट ट्रेनच्या भाडेवाढीबाबत( Bullet Train Ticket Price)सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी तो लोकांच्या आवाक्यात असेल, असे ते म्हणाले. यासाठी फर्स्ट एसीचा आधार घेतला जात आहे, ज्याचे भाडे तुलनेने फारसे जास्त नाही. ते विमानाच्या तिकिटापेक्षा कमी असेल आणि सुविधादेखील चांगल्या असतील. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुलेट ट्रेनचे भाडे निश्चित केले जाईल, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. (What will be the train ticket of Mumbai-Ahmedabad High speed bullet train? check the details)
अधिक वाचा : RBI ने पुन्हा 0.50 टक्क्यांनी वाढवला रेपो रेट, कर्जाचा EMI वाढणार
अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी बुलेट ट्रेन प्रकल्पाला भेट देऊन मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच दुसरा हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या दिशेने चांगली प्रगती होत असल्याने 2026 मध्ये गुजरातमधील सुरत ते बिलीमोरा दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे लक्ष्य गाठले जाईल, असे ते म्हणाले.
सरकारच्या महत्त्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वैष्णव सुरतमध्ये होते. ते म्हणाले की आम्ही 2026 मध्ये सूरत ते बिलीमोरा दरम्यान पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये चांगली प्रगती होत असून तोपर्यंत आम्ही बुलेट ट्रेन धावण्याचे काम पूर्ण करू असा विश्वास आहे.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, चीनने केवळ 115 किमी लांबीचा पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प बांधला होता. यातून धडा घेत चीनने देशात मोठे हाय-स्पीड रेल्वेचे जाळे उभारले आहे. वापी आणि साबरमती दरम्यानच्या आमच्या 352 किमी लांबीच्या रेल्वे मार्गामध्ये सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या तीन मोठ्या शहरांमध्ये इतकी ट्रॅफिक आहे की मुंबईची वाट पाहण्याची गरज नाही. यातूनच बरीचशी माहिती मिळेल.
अधिक वाचा : बँकेत नोकरीची सुवर्ण संधी; IBPS तर्फे तब्बल 8106 जागांसाठी मेगाभरती जाहीर; त्वरीत करा अर्ज
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 320 किमी प्रतितास वेगाने बुलेट ट्रेन धावण्याचा प्रस्ताव आहे. दोन्ही शहरांमध्ये एकूण 508 किमी अंतर असून त्यात 12 स्थानके असतील. या ट्रेनमुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ तीन तासांवर कमी होणार आहे. सध्या सहा तास लागतात. या प्रकल्पाची एकूण अंदाजे किंमत 1.1 लाख कोटी रुपये आहे. यापैकी 81 टक्के निधी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीद्वारे दिला जातो आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ६१ किमीच्या मार्गावर खांब उभारण्यात आले असून १५० किमीच्या मार्गावर काम सुरू असल्याचा दावा केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी केला.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर देशाच्या विविध महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू केले जाणार आहे.