नवी दिल्ली: भाजपनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेस पक्षाचं प्रदर्शन खूपच वाईट झालं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दणदणीत पराभव झाला. काँग्रेस पक्षाला ५४२ जागांपैकी केवळ ५२ जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर काँग्रेस पक्षानं आज कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. गेल्या तीन तासांपासून ही बैठक सुरू आहे. बैठकीपूर्वी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या.
या बैठकीत राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारून अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारिणीची सदस्यांसमोर सादर केल्याची माहिती समोर आली आहे.