मुंबई: बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि क्यूट अभिनेत्री आलिया भट्टचा यांचा आगामी सिनेमा 'इंशाल्लाह' चर्चेत आला आहे. या सिनेमाच्या शूटिंगला काही कारणामुळे पुढे ढकललं गेलं, अशी अफवा पसरली होती. मात्र, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचं शूटिंग वेळापत्रकानुसार सुरू होईल आणि 'इंशाल्लाह' चे शूटिंग मुंबईत सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे.
अलीकडेच अनेक वेबसाईटवर दिलेल्या बातम्यांमधून समोर आलं होतं की, दबंग 3 च्या शूटिंगमुळे 'इंशाल्लाह' सिनेमाच्या शूटिंगला उशीर होणार आहे. या बातम्यांनी बी टाऊनमध्ये वर डोकं काढलं होतं. पण आता या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट झालंय. या सिनेमाचं शूटिंग २१ ऑगस्टला वेळापत्रकानुसार सुरू होईल. सलमान आणि आलियानं एकत्र काम करायलाही सुरूवात केली असल्याचं संजय लीला भन्साळी यांनी सांगितलं.
आलियानं एका मुलाखतीत म्हटलं होतं की, मला सलमानला फेस करण्यात त्याच्या समोर येण्यासाठी भीती वाटत होती आणि खास करून त्यांच्यासमोर फॅन गर्लसारखा स्वभाव ठेवणार नाही अशी मी आशा स्वतःहून बाळगली होती. मात्र या दोघांमधील अस्ताव्यस्त करणापी परिस्थिती आता संपली आहे आणि ते दोघे एकत्र शूट करण्यासाठीही तयार आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं २० वर्षांनंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान एकत्र काम करणार आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’नंतर दोघांनी एकत्र काम केलं नव्हतं. भन्साळींच्या इंशाल्लाह' सिनेमाच्या निमित्तानं सलमान-आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
इंशाल्लाह' ही प्रेमकथा असणार आहे. या सिनेमात सलमानसोबत आलिय भट्ट प्रमुख भूमिकेत असेल. या सिनेमात सलमान खान चाळीशीच्या एका उद्योगपतीची भूमिका साकारणार असून आलिया त्याच्यापेक्षा अर्धा वयाच्या एका तरूण अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसेल. म्हणजेच, सिनेमात वेगवेगळ्या जनरेशनची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा भंन्साळी यांच्या लार्जर दॅन लाईफ सिनेमांपेक्षा एकदम वेगळा असणार आहे. सिनेमा खामोशी आणि हम दिल दे चुके सनमच्या धाटणीवर बनवण्याया विचार भंन्साळी करत असल्याचं बोललं जातंय. सलमान-आलिया या नवीन जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता प्रचंड आहे. हा सिनेमा २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.