मुंबई: दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि कंगना राणावत (Kangana Ranaut) या दोघांमध्ये ट्विटरवर (Twitter) शाब्दिक युद्ध (verbal war) चालू होते. शेतकरी आंदोलनावरून (farmers’ agitation) या दोन सेलिब्रिटीजमध्ये ट्विटरयुद्ध रंगले होते. मात्र याचा फायदा (benefit) दिलजीत दोसांझला मिळाला आहे. न्यूज18च्या माहितीनुसार दिलजीत दोसांझ आणि कंगना राणावत यांच्यात रंगलेल्या या युद्धामुळे दिलजीतच्या फॉलोवर्सच्या संख्येत (number of followers) चार लाखांनी वाढ (increased by 4 lakhs) झाली आहे. आता दिलजीतच्या फॉलोवर्सची संख्या ४३ लाखांवर गेली आहे.
ट्विटरशिवाय इंस्टाग्रामवरही दिलजीत दोसांझच्या फॅन फॉलोविंगमध्ये वाढ झाली आहे. कंगनाशी झालेल्या चकमकीनंतर दिलजीतचे दोन लाख फॉलोवर्स वाढले आहेत. इंस्टाग्रामवर आता त्याचे एक कोटी सात लाख फॉलोवर्स झाले आहेत.
शाहीन बाग आणि शेतकरी आंदोलनात दिसलेल्या एका वयस्कर महिलेवरून कंगनाने ट्विटरवर या प्रकाराला सुरुवात केली होती. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते, ‘लज्जास्पद... शेतकऱ्यांच्या नावावर सर्वजण आपापल्या पोळ्या भाजून घेत आहेत.’ या कंगनाच्या ट्वीटवर आक्षेप घेत दिलजीतने लिहिले होते, ‘या महिंदर कौर आहेत. इतकेही आंधळे असू नये.’ यानंतर कंगनाने हे ट्वीट डिलीट केले होते.
कंगना राणावतने दिलजीत दोसांझला करण जोहरचा पाळीव कुत्रा म्हटले होते. तिने लिहिले होते, ‘अरे करण जोहरच्या पाळीव कुत्र्या, ज्या आजी शाहीन बागेत आपल्या नागरिकतेसाठी आंदोलन करत होत्या त्याच बिलकिस बानो आजी शेतकऱ्यांसाठीही आंदोलन करताना दिसल्या.
महिंदर कौर कोण आहेत हे मला माहितीही नाही. काय नाटक चालवले आहे तुम्ही? हे लगेच थांबवा.’ दिलजीतने कंगनाच्या ट्वीटला उत्तर देत लिहिले होते, ‘जितक्या लोकांसोबत तू काम केलेस, त्या सर्वांची तू पाऴीव प्राणी आहेस का? मग तर मालकांची यादी फारच मोठी होईल.’