Malaika Arora Talks About Arjun Kapoor । मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिचा मागील महिन्यात अपघात झाला होता, ज्यामध्ये तिला खूप दुखापत झाली होती. त्यानंतर तिला दुखापत झालेल्या ठिकाणी टाकेही करण्यात आले होते. या अपघाताने मलायका हादरून गेली. मात्र तिने काही दिवसांतच शूटिंग सुरू केले असले तरी अपघातानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाला यावर अभिनेत्रीने मोकळेपणाने भाष्य केले आहे. दरम्यान तिने तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर बद्दल देखील भाष्य केले. (Malaika's intriguing dialogue about her relationship with Arjun said we do romance every day).
मलायका अरोराचा गेल्या महिन्यात अपघात झाला होता, दरम्यान आता तिने सांगितले आहे की अपघातानंतर तिची जीवनशैली किती बदलली आहे. यासोबतच तिने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही खुलासा केला.
अधिक वाचा : लग्नात नवरीने घातला चक्क २४ कॅरेट सोन्याचा ड्रेस
मलायकाने बॉम्बे टाइम्सशी बोलताना तिच्या अपघाताची रात्र भयानक रात्र असल्याचे सांगितले. अभिनेत्रीने म्हटले की, "मला आठवतय की माझ्या आजूबाजूला खूप रक्त सांडलं होतं. माझे कुटुंब आणि अर्जुन तिथे आले होते. अपघातानंतर सुमारे एक आठवड्यानंतर मी आरशात स्वतःकडे पाहिले आणि माझ्या कपाळावर एक खूण होती. डाग काय घडले ते सांगत होता आणि आयुष्य किती नाजूक आहे याची आठवण करून देत होता."
मलायकाने आणखी सांगितले की, "अपघातानंतर मी फक्त दोन गोष्टींसाठी प्रार्थना करत होते एक म्हणजे मला त्या रात्री मरायचे नव्हते आणि मला माझी दृष्टी गमवायची नव्हती.' मलायकाने सांगितले की, त्या दिवशी अपघात झाल्यानंतर ती सतत आई आणि मुलगा अरहानबद्दल विचारत होती. अभिनेत्रीने सांगितले की, अपघातानंतर तिच्या डोळ्यात काचेचे छोटे तुकडे अडकले होते.
मलायका अरोरा गेल्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे जेव्हा तिला विचारण्यात आले की ती आणि अर्जुन त्यांच्या नात्याला आणखी एका पातळीवर नेण्याचा विचार करत आहेत. यावर अभिनेत्री म्हणाली की, 'प्रत्येक नात्याची स्वतःची प्रक्रिया आणि काही योजना असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपल्याला माहित असेल की आपल्याला आपले भविष्य एकत्र हवे आहे. हे नाते माझ्यासाठी खूप खास आहे आणि आम्ही नेहमी आमच्या नात्याबद्दल विचार करतो की पुढे काय होईल.
तसेच आपण गोष्टींवर खूप चर्चा करतो. आमचे विचार सारखेच आहेत. आपण त्यावर हसतो आणि विनोद करतो, पण त्याबद्दल आपण खूप गंभीरही असतो. तुम्हाला तुमच्या नात्यात सकारात्मक आणि सुरक्षित वाटले पाहिजे. मी खूप आनंदी आणि सकारात्मक आहे. अर्जुन मला तो आत्मविश्वास आणि खात्री देतो. मला वाटत नाही की आपण एकाच वेळी सर्व गोष्टींबद्दल बोलले पाहिजे. आम्ही अजूनही आमच्या जीवनावर प्रेम करतो आणि दररोज रोमान्स करतो. मी त्याला नेहमी सांगते की मला तुझ्यासोबत वृद्ध व्हायचे आहे. असे मलायकाने आणखी म्हटले.