नवी दिल्ली: Yeh Rishta Kya Kehlata Hai Spoiler: ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या कथेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. कारण अभिमन्यूच्या जीवाला धोका आहे. अभिमन्यू सध्या रूग्णालयात जीवन मृत्यूशी झुंज आहे. टीव्ही मालिकेच्या अपकमिंग भागांमध्ये बिर्ला कुटुंब हॉस्पिटलमध्ये असून अभिमन्यूच्या जीवाला धोका असल्याचं दिसून येईल.
अक्षराला धक्का देणारा हा ट्विस्ट असेल. अक्षरा तिचा नवरा अभिमन्यूच्या आयुष्याची भीक मागणार आहे आणि तो शुद्धीवर येण्यासाठी प्रार्थना करणार आहे. मात्र, यादरम्यान असं काही घडणार आहे, ज्यामुळे बिर्ला कुटुंबाला धक्का बसेल. बिर्ला हॉस्पिटलला आग लागेल आणि अक्षराचा जीव धोक्यात येईल, हे आपण आतापर्यंत पाहिलं आहे.
अधिक वाचा- कशी करतात हरतालिकेची पूजा?; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, कहाणी आणि महत्त्व
यानंतर जेव्हा अभिमन्यू अक्षराला संकटात बघेल तेव्हा अक्षराचा जीव वाचवण्यासाठी तो सुपरमॅनप्रमाणे स्वतःचा जीव धोक्यात घालेल. अक्षराला वाचवण्यासाठी तो आगीशी खेळेल. त्यामुळे त्याचा जीव धोक्यात येईल.