मुंबई: बिग बॉस मराठीच्या खेळाचा १३वा आठवडा नुकताच सुरू झाला पण घरातले वाद काही केल्या संपत नाही आहेत. अशीच सुरुवात झाली नवीन एपिसोडची आणि घरात छोटे-मोठे वाद होताना दिसले. घरात छोट्या-मोठ्या गोष्टीवरुन बरेच मतभेद निर्माण झाले आणि मग घरात पुन्हा एकदा सुरु झाला फ्रीझ-रिलीजचा सिलसिला. बिग बॉस यांनी बिचुकले सोडून सगळ्या स्पर्धकांना फ्रीझ केलं. त्यानंतर घरात सुरु झाला 'तिकीट टू फिनाले' टास्क आणि त्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली घरातून बाहेर गेलेल्या काही स्पर्धकांनी. तिकीट टू फिनालेसाठी दोन स्पर्धकांची नावं या घरात पुन्हा दाखल झालेल्या पूर्व स्पर्धकांना द्यायची होती मग घरात शिरत सगळ्यांशी संवाद साधायचा होता. अखेर टास्क सुरु झाला आणि घरातल्या स्पर्धकांना मिळालं एक गोड सरप्राईज.
पहिली एन्ट्री झाली विद्याधर जोशी म्हणजे बाप्पा यांची आणि त्यांनी नेहा आणि शिवानीलाचं नाव घेतलं. त्यानंतर पुन्हा सगळे फ्रीझ केले गेले आणि नेहा आणि शिवानीला सेफ करत घरात दाखल झाला दिगंबर नाईक. त्यानंतर घरात दाखल झाली मैथिली जावकर आणि तिने शिव आणि वीणाचं नाव घेतलं. तर त्यापुढे आल्या सुरेखा पुणेकर आणि त्यांनी शिवानी आणि नेहाला सेफ केलं. पण सुरेखा घरातून बाहेर जाताच घरात एक मोठा वाद निर्माण झाला. सुरेखा या घरात असताना बिचुकले त्यांना उगाच काहीतरी बोलला आणि ते घरात कोणालाच आवडलं नाही. याच विषयावरुन घरात मोठा राडा झाला आणि सगळे बिचुकलेच्या विरोधात गेले.
मग घरात दाखल झाली वैशाली म्हाडे जी नेहा आणि शिवला सेफ करताना दिसली. तसंच घरात दाखल होत तिने घरात बनलेल्या भावाला म्हणजे शिवलाच राखी सुद्धा बांधली. त्यानंतर घरात आला माधव आणि अपेक्षेप्रमाणे त्याने नेहा आणि शिवानीला सेफ केलं. नंतर घरात बनलेला खास मित्र बिचुकलेला माधव भेटताना दिसला आणि त्यांच्या मैत्रीसाठी दोघांनी छान गाणी देखील गायली.
अखेर या नोटवर टास्क संपला खरा पण या टास्कने घरात एक वेगळा उत्साह निर्माण झाला हे नक्की. शिवाय स्पर्धकांना काही नवीन आठवणी सुद्धा मिळाल्या कायम स्मरणात राहतील अशा. हा एपिसोड तर सपंला पण टास्क मात्र अजून सुरु आहे. या टास्कचा पुढचा भाग पुढच्या एपिसोडमध्ये पार पडेल आणि अजून काही घरातून बाहेर गेलेले स्पर्धक घरात पुन्हा एन्ट्री घेतील. तसंच या टास्कमध्ये विजेता ठरत कोण तिकीट टू फिनाले मिळवतं ते पण कळेलंच. त्यामुळ पुढचा एपिसोड फार महत्त्वाचा ठरणार आहे. या आठवड्याच्या नॉमिनेशन सोबत घरातल्या कोण्त्या दोन स्पर्धकांना थेट फिनालेत पोहचायची संधी मिळणार आहे ते सुद्धा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुढचा एपिसोड खेळाच्या दृष्टीने देखील फारंच महत्त्वाचा ठरणार हे निश्चित.