Chanakya Niti In Marathi, women with these qualities are considered lucky for their husbands : आचार्य चाणक्य यांची चाणक्य निती आजच्या काळात खूप लोकप्रिय आहेत. चाणक्याने आपल्या चाणक्य नितीमध्ये यश आणि समृद्धी मिळविण्यासाठी अनेक उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत. असे सांगतात की जी व्यक्ती या गोष्टी आपल्या जीवनात अंगीकारते त्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होते. चाणक्याची चाणक्य निती लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम करते. जाणून घ्या चाणक्याच्या चाणक्य नितीनुसार कोणत्या महिलांना त्यांच्या पतीसाठी भाग्यवान मानले जाते.
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 5 महत्त्वाचे विचार
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स
चाणक्य यांनी त्यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि मगधच्या धनानंद राजाच्या जुलमातून प्रजेला सोडवण्यासाठी चंद्रगुप्तास प्रशिक्षित करून मगध जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. पुढे चाणक्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजसभेत महामंत्री झाले. चाणक्य हेच विष्णूगुप्त होते. त्यांना कौटिल्य या नावानेही ओळखले जात होते. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात चाणक्य यांचा मुख्य सहभाग होता.
चाणक्य यांनी रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक उत्तम ग्रंथ म्हणून ओळखला जातो. यात 25 प्रकरणे आणि 6 हजार श्लोक आहेत. ग्रंथाद्वारे अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण याबाबत मार्गदर्शन केले आहे. हा अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करणारा पहिला मानवी ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथात नमूद निती ही चाणक्य निती किंवा दंड निती या नावाने ओळखली जाते. आचार्य चाणक्य हे महान अर्थतज्ज्ञ आणि कूटनिती तज्ज्ञ होते. त्यांनी लिहिलेली निती ही चाणक्य निती म्हणून ओळखली जाते. या चाणक्य नितीमध्ये कोणी कसे वागावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन आढळते.