Health News | मुंबई : सकाळी उठल्याबरोबर जर कोणाचे पोट साफ झाले नाही तर त्याचा दिवस खराब जाण्याची शक्यता असते. जर तुम्हाला ऑफिसमध्ये जाण्यासाठी धावपळ करावी लागत असेल किंवा कुठे लवकर जायचे असेल अशावेळी पोट बिघडण्याची समस्या जाणवल्याने कामात व्यत्यय येतो. बर्याच लोकांसाठी ही एक कायमची समस्या आहे जिथे त्यांना जवळजवळ दररोज पोटदुखी, गॅस आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (If you do not have a clear stomach when you wake up every morning, do this work).
ही समस्या केवळ शारिरीकच नाही तर त्यामुळे मानसिकदृष्ट्याही तुम्ही तुमचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित करू शकत नाही. काही लोकांसाठी ते डोकेदुखीचे कारण बनते. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. डॉ दीक्षा यांच्या मते, आयुर्वेदात बद्धकोष्ठतेचे (Acidity) मुख्य कारण खराब चयापचय असल्याचे सांगितले जाते, ज्याला मंदाग्नी असेही म्हणतात.
तुम्हालाही याबाबत माहिती असेल की शरीर योग्यरित्या चालवण्यासाठी आतड्यांमध्ये हार्मोन्स तयार होतात. त्यांना योग्यरित्या प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला दररोज पोट रिकामे करणे आवश्यक आहे. शरीरात वापरले जाणारे ७०-८५% हार्मोन्स अशा प्रकारे तयार होतात आणि जर पोट रिकामे नसेल तर ही प्रक्रिया देखील योग्यरित्या पूर्ण होत नाही.
ॲसिडीटी पासून सुटका मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे शौचालयात बसून जास्त वेळ घालवणे. बरेच लोक शौचालयातून लगेच उठण्याचा प्रयत्न करतात, पण हे योग्य नाही. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा अर्थात ॲसिडीचा त्रास होत असेल तर थोडा वेळ देणे आवश्यक आहे.
त्यासाठी शौचालयामध्ये कोणतेही करमणुकीचे साधन घेऊन जाऊ नये, जसे की मोबाईल. तुम्हाला बद्धकोष्ठता असल्यास कोणत्याही गॅझेट्स किंवा पुस्तकांशिवाय शौचालयात किमान १५-२० मिनिटे देण्याचा प्रयत्न करा. याशिवाय दररोज एक नियम बनवण्याचा प्रयत्न करा की रोज एकाचवेळी जेवण करण्याचा प्रयत्न करू.
डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.