Weight Losst Tips in Marathi : मुंबई: लठ्ठपणा ही मोठी समस्या आहे. वजन वाढवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा जास्त वजन कमी करण्यासाठी लागते. लठ्ठपणा वाढण्यासाठी चुकीची लाईफस्टाईल, चुकीचा आहार कारणीभूत ठरतात. परंतु उन्हाळ्यात वजन झटपत कमी होतं. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचा आहे.
उन्हाळ्याच्या सीजनमध्ये अनेक प्रकारची फळे मिळतात. त्यात मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि त्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. या फळांमुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. जर तुमचेही वजन वाढले असेल तर आपल्या आहारा काही फळ आणि पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी लो कॅलरी फूट आणि धान्यांचा समावेश करावा. तसेच उन्हाळ्यात येणार्या फळांचा आहार घेतल्यास तुमचे वजन कमी होईल.
उन्हाळ्यात आवर्जून सलाडचा आहार घ्यावा. सलाडमुळे शरीरासाठी आवश्यक असलेली सर्व तत्वं मिळतात. तसेच शरीतात पाण्याची कमतरता होत नाही. सलाड खाल्ल्यामुळे पोट भरतं आणि खूप वेळ भूक लागत नाही. उन्हाळ्यात जास्त खाणे हे शरीरासाठी घातक आहे. सलाड खाल्ल्याने फार वजन वाढत नाही. सलाडमध्ये काकडी, टोमॅटो सारख्या पदार्थांचा समावेश करा.
टरबूज किंवा कलिंगड
कलिंगड खाल्यास शरीरातील पाणी कमी होत नाही. तसे कलिंगडमधील अँटीऑक्सिडेंट लाइकोपिन असल्यामुळे पोटातील चरबी कमी होते. कलिंगडात फॅट नसतात. कलिंगड आणि टरबूज खाल्यामुळे वजन कमी होते. सलाडमध्ये तुम्ही कलिंगड खाऊ शकता.
पचनसंस्था चांगली होण्यासाठी दही फायदेशीर आहे. तसेच वजन कमी करण्यासाठीही दही फायदेशीर ठरतं. दही खाल्ल्याने फार वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.
अननसही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. अननस हे फळ पचण्यास सोपे आहे आणि त्यामुळे वजनही नियंत्रणात राहतं. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी इन्फ्लामेंटरी तत्व असतात त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.