Lord Ganesh Story : बुधवारी जरूर ऐका गणपतीची कथा; सुख- सुविधांसह भावाच्या मोठ्या आयुष्याचा मिळेल लाभ

Ganesh Story | प्रत्येक शुभकार्यापूर्वी अथवा पूजेपूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते. विशेषत: महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी गणेशाची पूजा करतात. श्रीगणेशाची आराधना केल्याने पतीच्या दीर्घायुष्यासोबतच सासरचे लोक सदैव सुखी राहतात.

Be sure to listen to Ganesha's story on Wednesday Benefits will get of brother for long life
बुधवारी जरूर ऐका गणू बाप्पाची कथा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक शुभकार्यापूर्वी अथवा पूजेपूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते.
  • बुधवारी जरूर ऐका गणेशाची कथा.
  • गणेशाची कथा ऐकल्याने भावाला दीर्घायुष्य लाभते.

Ganesh Story | नवी दिल्ली : प्रत्येक शुभकार्यापूर्वी अथवा पूजेपूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते. विशेषत: महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी गणेशाची पूजा करतात. श्रीगणेशाची आराधना केल्याने पतीच्या दीर्घायुष्यासोबतच सासरचे लोक सदैव सुखी राहतात. असे मानले जाते. त्यांच्या आयुष्यात दु:ख किंवा गरिबी कधीच येत नाही. त्यामुळे अशी ही दीर्घायुष्य देणाऱ्या श्रीगणेशाची अद्भुत कहाणी सर्वतोपरी प्रसिध्द आहे.(Be sure to listen to Ganesha's story on Wednesday Benefits will get of brother for long life).  

एके काळी एक भाऊ आणि बहीण राहत होते. भावाचा चेहरा पाहूनच जेवण करायचे असा बहिणीचा नियम होता. रोज सकाळी लवकर उठून सगळी कामं आटोपून भावाचं तोंड बघायला ती भावाच्या घरी जात असे. एके दिवशी वाटेत गणेशाची मूर्ती पिंपळाखाली ठेवली. त्यांनी देवासमोर हात जोडून सांगितले की, माझ्यासारखा अमर परिवार आणि माझ्यासारखा अमर पेहार सर्वांना दे. असे म्हणत ती पुढे निघून जात होती.

जंगलातील झुडपांचे काटे तिच्या पायाला टोचत होते. मात्र तरीदेखील ती  एक दिवस भावाच्या घरी पोहोचली आणि भावाच्या चेहऱ्याकडे बघत बसली, तेव्हा वहिनीने विचारले की तिच्या पायाला काय झाले आहे? हे ऐकून तिने वहिनीला उत्तर दिले की वाटेत जंगलातील झुडपांचे पडलेले काटे पायात टोचले होते. घरी आल्यावर वहिनी पतीला म्हणाली रस्ता मोकळा करून द्या, तुमच्या बहिणीच्या पायात खूप काटे आहेत. त्यानंतर भावाने कुऱ्हाड घेऊन सर्व झुडपे तोडून रस्ता मोकळा केला. त्यामुळे गणेशजींचे स्थानही तेथून हटवण्यात आले. हे पाहून देवाला राग आला आणि त्याने भावाचा जीव घेतला.

अधिक वाचा : बुध आणि मंगळ ग्रहासारखी पृथ्वीदेखील निर्जन होण्याची शक्यता

भावाचा जीव गेल्याचे समजल्यावर गावातील लोकं भावाला अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात होते, तेव्हा त्याच्या वहिनीने रडणाऱ्या लोकांकडून थोडावेळ थांबावे, त्याची बहीण येणार आहे. भावाचा चेहरा पाहिल्याशिवाय ती राहू शकत नाही. हा त्याचा नियम आहे असे सांगितले. तेव्हा लोक म्हणाले आज ती बघेल पण तिला हे उद्या कसे दिसेल. रोजच्या प्रमाणे बहीण आपल्या भावाचा चेहरा पाहण्यासाठी जंगलात गेली.

मग जंगलात तिने पाहिले की सर्व मार्ग मोकळा झाला आहे. पुढे गेल्यावर तिला दिसले की सिद्धिविनायकही तिथून काढले गेले आहेत. मग निघण्यापूर्वी तिने गणेशजींना एका चांगल्या जागी बसवून जागा दिली आणि हात जोडून म्हणाली, देवा माझ्यासारखा अमर गोड आणि माझ्यासारखा अमर पिहार सर्वांना दे आणि ते बोलून ती पुढे निघून गेली.

देव मग विचार करू लागले की जर हिचे ऐकले नाही तर आपल्यावर कोण विश्वास ठेवेल, कोण आपली पूजा करेल. तेव्हा सिद्धिविनायकाने तिला हाक मारली बेटी या खेजरीची सात पाने घेऊन ती कच्च्या दुधात मिसळून भावावर शिंपड मग तो उठून बसेल. हे ऐकून बहिण मागे वळली तेव्हा तिथे कोणीच नव्हते. मग ती विचार करू लागली की मी ऐकले तसे करायला हरकत नाही. त्यानंतर ती ७ खेजरीची पाने घेऊन भावाच्या घरी पोहोचली.

तिथे बरेच लोक बसलेले तिने पाहिले. तिच्या भावाची पत्नी म्हणजेच तिची वहिनी रडत बसली होती. समोर भावाचा मृतदेह ठेवला होता. नंतर तिने सांगितलेल्या नियमानुसार त्या पानांचा उपयोग भावावर केला. मग भाऊ उठून बसला. भाऊ बहिणीला म्हणाला, मी खूप गाढ झोपलो होतो. तेव्हा बहिणीने सांगितले की ही झोप कोणत्याही शत्रूलाही येऊ नये आणि तिने संपूर्ण गोष्ट भावाला सांगितली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी