Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनानंतर 'या' तीन तारखांना बांधू नका राखी!

Raksha Bandhan 2022: भाऊ आणि बहिणीच्या असीम प्रेमाचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. यावेळी 11 आणि 12 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जात आहे.

dont tie rakhi of after raksha bandhan on these days read this important information
Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनानंतर 'या' तीन तारखांना बांधू नका राखी! 
थोडं पण कामाचं
  • भाऊ-बहिणीच्या अपार प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण मोठ्या थाटामाटात साजरा
  • यावेळी 11 आणि 12 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केला जात आहे.
  • गुरुवारी सकाळी 09:34 वाजता श्रावण महिन्याची पौर्णिमा सुरू होईल.

Raksha Bandhan 2022: भाऊ आणि बहिणीच्या असीम प्रेमाचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन (Raksha Bandhan) देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. यावेळी 11 आणि 12 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केला जात आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी (Rakhi) बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची शुभेच्छा देतात. गुरुवारी सकाळी 09:34 वाजता श्रावण (Sharavan) महिन्याची पौर्णिमा सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी सकाळी 07:18 वाजता संपेल. 11 ऑगस्ट रोजी पौर्णिमा तिथी सुरु झाल्यानंतर भद्रा कालावधी सुरू होईल. जो 11 ऑगस्ट रोजी रात्री 08:30 वाजता संपेल. त्यामुळे राखी बांधण्याचा मुहूर्त 11 तारखेला रात्री 8.51 ते 09:12 पर्यंतचा असेल.

ज्या बहिणी आपल्या भावाला स्वतः राखी बांधत आहेत, त्यांनी ही तारीख लक्षात ठेवावी. भद्रा काळात राखी बांधणे हे शुभ नाही. त्याचप्रमाणे ज्या बहिणी दूर राहतात आणि आपल्या भावासांठी त्या राखी पाठवतात पण काही कारणास्तव त्यांना रक्षाबंधनानंतर राखी मिळाल्यास भावांनी एक गोष्ट जरुर लक्षात ठेवावी. ती म्हणजे ज्यांना त्यांच्या बहिणींनी राखी पाठवली आहे, त्यांनी ती राखी आपली मुलगी किंवा आत्या अशांकडून बांधून घ्यावी. हवं असल्यास तुम्ही पुरोहिताकडून देखील राखी बांधून घेऊ शकतात.

अधिक वाचा: Rakhi Purnima 2022 Marathi Wishes : रक्षाबंधन निमित्त Facebook, Instagram, WhatsApp, Twitter आणि Social Media वर शेअर करा मराठी शुभेच्छा

रक्षाबंधनानंतर राखी बांधण्याची योग्य वेळ

रक्षाबंधन पार पडल्यानंतरही राखी बांधण्यासाठी दिवस आणि तारखेची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रतिपदा तिथी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येते आणि या दिवशी राखी बांधणे योग्य नाही. अशा स्थितीत पुढील आठवडा किंवा 15 दिवसात राखी बांधा. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राखी बांधावी असे म्हणतात. रात्री राखी बांधणे शुभ मानले जात नाही.

या मंत्राचा जप करा

राखी बांधताना लक्षात ठेवा की, तुमचा चेहरा पूर्व दिशेला असावा. तसेच या मंत्राचा जप करा - येन बद्धो बलि राजा,दानवेन्द्रो महाबल: । तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:।। या मंत्राचा जप केल्याने सर्व काही शुभ होते.

अधिक वाचा: Rakhi Purnima 2022 Marathi HD Images : रक्षाबंधन निमित्त आपल्या भावाला आणि बहिणीला मराठी संदेश शेअर करून साजरा करा रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या थाळीमध्ये या गोष्टी जरूर करा सामील

रक्षाबंधन भावाला राखी बांधण्याआधी त्याची आरती ओवाळली जाते. जाणून घ्या पुजेच्या थाळीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा.

  1. अक्षता - हिंदू धर्मात पुजेच्या थाळीमध्ये अक्षतांना विशेष महत्त्व असते. कोणत्याही शुभ कार्यांमध्ये अक्षतांचा वापर केला जातो. यासाठी राखीच्या थाळीमध्ये अक्षतांचा समावेश जरूर करावा. कारण अक्षता या पूर्णतेचे प्रतीक असतात. तसेच याचा वापर केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो. यासाठी आरती ओवाळताना अक्षता जरूर लावा. कारण असे म्हणतात की अक्षता लावल्याने भावाला दीर्घायुष्य प्राप्त होते. 
  2. कुंकू  - रक्षाबंधनासाठी थाळी सजवताना त्यात कुंकू जरूर ठेवा. सिंदूर अथवा कुंकू हे लक्ष्मी  मातेचे प्रतीक असते. यासाठीी कुंकू आपल्या थाळीत जरूर ठेवा. भावाला कुंकू लावल्याने त्याच्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहते. सोबतच पैशांची कोणतीही कमतरता भासत नाही. 
  3. चंदनाने शांत होणार मन - ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते की भावाच्या डोक्यावर चंदन लावल्याने त्याचे मन शांत राहते. चंदन डोक्यावर लावल्याने भावाला भगवान विष्णू आणि गणपतीचा आशीर्वाद मिळतो. चंदन लावल्याने मन शांत राहते आणि भाऊ धर्म आणि कर्माच्या रस्त्यावरून भटकता कामा नये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी