Mirachi Upay : मुंबई : आपण आयुष्यात खुप मेहनत करतो. परंतु आपल्याला यश मिळेलच असे नाही. काही लोक चांगले शिक्षण (education) घेऊन, कुशल (skilled) असूनही त्यांना नोकरी (job) मिळत नाही. दररोज नवनवीन ठिकाणी मुलाखत (job interview) देऊन पदरी निराशाच येते. अशा वेळी काही सोपे उपाय केल्यास नक्की फायदा होईल. अनेक वेळेला आपल्याला ग्रहदोषांमुळे (grah dosh) होणारी कामेही होत नाहीत. आज आपण लाल मिर्चीचा (lal mirachi upay) उपाय जाणून घेऊया त्यामुळे तुम्हाला आपल्या कार्यात नक्की यश मिळेल.
खुप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळते नसेल तर फार टेन्शन घेऊ नका. अशा वेळी घरात असलेल्या लाल मिरचीचा उपाय करा. पाच लाल मिरच्या घ्या आणि नोकरीसाठी मुलाखतीला जाण्यापूर्वी घराच्या उंबरठ्यावर ठेवा. त्यानंतर मुलाखत असो वा कुठलेही शुभ कार्य, या मिरचीवर पाय ठेवून घराबाहेर निघा. असे केल्याने मुलाखातीत यश मिळेल. तसेच ज्या कामासाठी तुम्ही निघालात त्या कामात तुम्हाला यश मिळेल. जर खुप दिवस तुमचे काम अडकले असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खुप फायदेशीर ठरेल. या उपायामुळे तुमची कामे होतील आणि कार्यात यश मिळेल.
अधिक वाचा : मोराचे पिस कोणत्या दिशेला ठेवावेत? धनलाभासाठी अशा प्रकारे करा वापर
लाल मिरचिचा वापर नजर काढण्यासाठीही होतो. जर कुणाला नजर लागली असेल तर पाच लाल मिरच्या घ्या. त्यासोबत थोडे मीट आणि पिवळ्या डाळ घ्या. ही सर्व सामग्री एका कपड्यात बांधा आणि ज्या व्यक्तीला नजर लागली आहे त्याच्यावरून ७ वेळा उतरवून काढा. लक्षात ठेवा उजवीकडून ही सामग्री उतरवा आणि नंतर ही सामग्री जाळून टाका. कुणालाही लागलेली नजर निघून जाईल तसे घरातली नकारात्मकता नष्ट होईल. अधिक वाचा : Moti Gemstone
Benefits : या चार राशीच्या लोकांसाठी मोती आहे शुभ, जाणून घ्या मोती वापरण्याची पद्धत आणि विधी
(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)