मुंबई: आपल्या देशात अधिकतर लोक पुजा करताना धातूच्या भांड्याऐवजी स्टीलच्या भांड्याचा वापर करतात. धर्मानुसार स्टीलच्या भांड्याचा वापर पुजेमध्ये करणे शुभ मानले जात नाही. हिंदू धर्मात धातूच्या भांड्यांमध्ये केली जाणारी पुजा ही शुभ मानली जाते. शास्त्रानुसार पुजेमध्ये वापरली जाणारी विविध धातूंची भांडी वेगवेगळे फायदे देतात. पितळ आणि तांब्याची भांडी वापरल्याने अनेक फायदे होतात.
स्टील, लोखंड अथवा अॅल्युमिनियमची भांड्यांचा वापर पुजेसाठी करणे अशुभ असते. इतकंच नव्हे तर या धातूची मूर्तीही पुजेसाठी शुभ मानली जात नाही. धातुच्या वस्तू पुजेसाठी शुभ मानल्या जातात. शास्त्रांनुसार पुजेमध्ये सोने, चांदी, पितळ आणि तांब्याची भांडी वापरणे लाभदायक असते. अशा भांड्यांतून जलाभिषेक केल्याने पुण्यप्राप्ती होते.
तज्ञांच्या मते स्टीलची भांडी पुजेसाठी वापरल्याने ती लवकर खराब होतात. त्यात गंज लागण्याची शक्यता असते. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले असता या धातुच्या भांड्यानी केलेला जलाभिषेक शुभ मानला जातो. मान्यतेनुसार धातुच्या भांड्यातून पुजा केल्याने देव लवकर प्रसन्न होतात.
यामुळे जीवनात अनेक कष्ट निर्माण होतात. जर तुम्ही इष्ट देवतेला प्रसन्न करण्यासाठी स्टीलचा भांड्याचा वापर करत आहात तर आजच थांबवा. त्याच्या जागी पितळ, तांबे, सोने अथवा चांदीसारखी भांडी वापराल. यामुळे तुमच्या घरात सुख वैभव नांदेल.