Panchmukhi Rudraksha: पंचमुखी रुद्राक्षचे आहेत अगणित फायदे, जीवनात कोणतेच संकट येणार नाहीत

धर्म-कर्म-भविष्य
Updated Mar 31, 2023 | 05:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rudraksha ज्योतिष शास्त्रानुसार महादेवाला रुद्राक्ष खूप प्रिय आहे, असे म्हणतात की रुद्राक्षची उत्पत्ती शंकराच्या अश्रूंपासून झाली आहे. असे हे पंचमुखी रुद्राक्ष परिधान करण्याचे फायदे आपण इथे जाणून घेणार आहोत. 

पंचमुखी रुद्राक्षाचे महत्त्व
Panchmukhi Rudraksha Mala benefits  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिष शास्त्रानुसार महादेवाला रुद्राक्ष खूप प्रिय आहे,
  • रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते अशी धारणा आहे.
  • पंचमुखी रुद्राक्ष कसे धारण करावे?

Rudraksha Benefits: शास्त्रामध्ये रुद्राक्ष अत्यंत प्रिय आणि पवित्र मानले गेले आहेत. असे म्हटले जाते की रुद्राक्षाचा वापर सामान्यतः धार्मिक कार्यांमध्ये केला जातो. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते अशी धारणा आहे. शास्त्रात एकमुखी पासून पंधरामुखी पर्यंत रुद्राक्ष सांगितले गेले आहेत. ज्यातील एकमुखी रुद्राक्ष आणि गौरीशंकर रुद्राक्ष सर्वात शुभ मानले जाते.

असे मानतात की, एखाद्या व्यक्तीने एकमुखी रुद्राक्षाची माळ घातली तर त्याच्यामध्ये जग जिंकण्याची क्षमता येते. तुम्ही पंचमुखी रुद्राक्षदेखील परिधान करू शकता. हे रुद्राक्ष सहज उपलब्ध होऊ शकतात. panchmukhi rudraksha mala benefits

अधिक वाचा : ​'या' 5 आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमची किडनी ठेवतात निरोगी

पंचमुखी रुद्राक्ष कसे धारण करावे 

ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष परिधान करण्यापूर्वी गंगेच्या पाण्याने ते शुद्ध करा. यानंतर भगवान शंकराच्या ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. अशाप्रकारे माळ पावन होते. रुद्राक्षाची माळ शुभ मुहूर्तावर धारण करणे लाभदायक मानली जाते.        

पंचमुखी रुद्राक्षाचे महत्त्व

  • पंचमुखी रुद्राक्षामध्ये पाच रेषा असतात. त्यांना पंचदेवांचे प्रतीक मानले जाते. असे रुद्राक्ष परिधान केल्यामुळे त्या व्यक्तीला असंख्य फायदे होतात. ते धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता येते आणि त्याला यश मिळते. तसेच व्यक्तीचे दुर्दैव्य दूर होऊन त्याचे भाग्य उजळते. त्या व्यक्तीची प्रगती होत जाते. त्याच्या मनातील सर्व इच्छा न सांगता पूर्ण होतात.
  • सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना रुद्राक्ष परिधान केल्याचा विशेष फायदा होतो. वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी त्याच्यावर सदैव खूश राहतात. शिवाय, खाजगी नोकऱ्यांमध्ये असलेल्यांना देखील बढती आणि पगारवाढ मिळते.
  • तब्येतीबद्दल बोलायला गेले तर रुद्राक्ष परिधान केल्याने आरोग्य चांगले राहतेच, पण त्याबरोबरच चिंता आणि मानसिक तणावदेखील दूर होतो. रक्तदाब नियंत्रणात येते, व्यक्ती अनेक आजारांपासून सुरक्षित राहतो.     

अधिक वाचा : ​राम नवमीच्या दिवशी भारतातील दोन मंदिरांमध्ये दुर्घटना

रुद्राक्ष परिधान करताना नका करू या चुका

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी