मुंबई: शनीच्या साडेसातीची दशा ही सात वर्षांपर्यंत सुरू असते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात कमी अधिक वेळा याचा सामना जरूर करावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार सौरमंडळातील सर्व ग्रह हे राशीतून दुसऱ्या राशीत फिरत असतात. या सर्व ग्रहांमध्ये शनी हा सगळ्यात कमी वेगाने फिरणारा ग्रह आहे. शनिला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी दीड वर्षांचा वेळ लागतो. शनी ग्रह एकाच वेळेस ५ राशींवर आपला परिणाम करत असतो.
धनु राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीची अंतिम टप्प्यात आहे. त्यांना शनिच्या दशेतून मुक्ती २९ एप्रिल २०२२ला मिळेल. ज्योतिषानुसार शनिच्या साडेसातीचा हा टप्पा बाकी टप्प्याच्या तुलनेत कमी त्रासदायक असेल. तसेच या व्यक्तीला काही ना काही लाभ मिळतील.
ज्योतिषानुसार जर शनि ग्रह एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीत बाराव्या, पहिल्या, दुसऱ्या आणि जन्माच्या चंद्रावरून जात असेल तर त्याला शनिची साडेसाती म्हणतात. याचे तीन टप्पे असतात. यातील दुसरा टप्पात्रासदायक असतेो. तर शेवटच्या टप्प्यात काही ना काही लाभ होतात.
शनिच्या साडेसातीचा अखेरचा टप्पा मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक मीन राशीसाठी त्रासदायक मानला जातो. या दरम्यान व्यक्तीला भौतिक सुखांचा लाभ मिळत नाही. जितके उत्त्पन्न असते त्यापेक्षा खर्च अधिक असतो. वादाची कारणे बनतात. मात्र ज्योतिषानुसार शनिच्या साडेसातीचा हा टप्पा काही ना काही लाभ देत जातो.
धनू राशीवर शनिच्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे. अंतिम टप्पा असल्याने पहिल्यापेक्षा कमी त्रास होईल. नोकरीत सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात सुधारणा होईल. कुटुंबाचा सपोर्ट मिळेल. जे लव्ह रिलेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी चांगला काळ आहे.