Gita Jayanti: नवी दिल्ली : हिंदू धर्मा (Hinduism) साठी सर्वात पवित्र दिवस म्हणजे गीता जयंती. मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीलाच अर्जुना (Arjuna) ला श्रीकृष्णा (Sri Krishna) कडून गीतेचे ज्ञान मिळाले. त्यामुळे आज 14 डिसेंबर रोजी हा सण साजरा केला जात आहे. महाभारता (Mahabharat)च्या युद्धात अर्जुनाच्या समोर त्याचे स्वतःचे कुटुंबातील-नातेवाईक होते, त्यावेळी युद्धाचे शस्त्र खाली टाकून दिलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीता उपदेश (Gita Updesh) केला होता.
गीताचे दुसरे नाव गीतोपनिषद
गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. गीतेचे दुसरे नाव गीतोपनिषद आहे. गीता जयंतीच्या दिवशी गीता वाचणे आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. गीतेची शिकवण आत्मसात केल्याने जीवनातील यशाचा मार्ग प्रशस्त होतो आणि सर्व शंका नष्ट होतात. श्रीमद भागवत गीतेत सर्व समस्यांचे समाधान सांगितले आहे. केवळ अर्जुनच नाही तर बर्बरिका, हनुमान आणि संजय यांनीही भगवान श्रीकृष्णाकडून गीतेचा उपदेश ऐकला होता.
गीता महत्त्वाची का आहे?