What is Kalashtami? What is the rule of Kalashtami? : कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी अर्थात अष्टमीला असते. अष्टमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. यंदा कालाष्टमी मंगळवार 14 मार्च 2023 रोजी सुरू होत आहे.
कालभैरव किंवा काळभैरव या नावाने ओळखला जाणारा अवतार हा भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे असे सांगतात. कालाष्टमीला महादेवाचे अर्थात भगवान शिव यांचे रौद्र रूप असलेल्या कालभैरवाची (काळभैरव) पूजा करतात. शनी आणि राहूच्या दशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही पूजा अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगतात.
कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि धूतवस्त्र परिधान करावे अथवा सोवळे नेसावे. यानंतर कालभैरवाची मूर्ती शुभ ठिकाणी स्थापित करावी. त्यानंतर गंगाजल अथवा आपल्या भागातील नदीचे पाणी शिंपडून ते स्थान शुद्ध करुन घ्या. आता कालभैरवाच्या मूर्तीला फुले, नारळ, इमरती, पान आदी वाहून मनोभावे विधीवत पूजा करा. जा करतांना आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला राहील याची काळजी घ्या. भगवान कालभैरवासमोर धूप दीप लावा. भैरव मंत्रांचा 108 वेळा जप करा. आरती करुन पूजा संपन्न करा.
पूजेचा ध्यानमंत्र
"अष्टकालं महाकालं भैरवाष्टगणान्वितम्।
चंद्रमासहितं शुक्ल मृत्युंजय नमोऽस्तु ते ॥"
कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी 'अष्टकालं....' हा पूजेचा ध्यानमंत्र म्हणा.
आरती ओवाळू भावें, श्री काळभैरावाला ||
दिनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ||
देवा, प्रसन्न हो मजला || धृ ||
धन्य तुझा अवतार जागी, या रौद्ररुपधारी |
उग्र भयंकर भव्य मुर्ति, परि भक्तांसी तारी |
काशीक्षेत्री वास तुझा, तू तिथला अधिकार |
तुझिया नामस्मरणे, पळती पिशाच्चादि भारी ||
पळती पिशाच्चादि भारी || आरती .....|| १ ||
उपासकां वरदायक होसी, ऐसी तव कीर्ती |
क्षुद्र जीव मी अपराधांना, माझ्या नच गणती |
क्षमा करावी, कृपा असावी, सदैव मजवरती |
मिलींदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ||
देवा घडो तुझी भक्ती || आरती .... || २ ||
ओम कालभैरवाय नम:। ओम ह्रीं बं बटुकाय आपदुद्धारणाय कुरूकुरू बटुकाय ह्रीं। ओम भ्रं कालभैरवाय फट्। जय भैरव देवा, प्रभु जय भैंरव देवा।
देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् ।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ १॥
भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ २॥
शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ३॥
भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥ ४॥
धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मधायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभितांगमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ५॥
रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम् ।
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ६॥
अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं दृष्टिपात्तनष्टपापजालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ७॥
भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ८॥
॥ फल श्रुति॥
कालभैरवाष्टकं पठंति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिं नरा ध्रुवम् ॥
॥इति कालभैरवाष्टकम् संपूर्णम् ॥
एकदा श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये वाद झाला. आपल्या दोघांत श्रेष्ठ कोण असा हा वाद होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी दोघे भगवान शंकर यांच्याकडे गेले. शंकराच्या कैलासावर एक सभा सुरू होती. या सभेला अनेक ऋषीमुनी, संत महंत, ज्ञानी उपस्थित होते. या मंडळींच्या उपस्थितीत शंकराने श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मदेव यांची समजूत काढली. विष्णू देवाला भगवान शंकर यांनी जे सांगितले ते पटले. पण ब्रह्मदेवाचे समाधान झाले नव्हते. ब्रह्मदेव भगवान शिव यांचा अपमान करू लागले. यामुळे संतापलेल्या शंकराने रौद्र रूप धारण केले. हे रूप पाहून सभास्थळी उपस्थित असलेले सर्वजण घाबरले.
शंकराचे रौद्र रूप म्हणजेच भैरव. या भैरवासोबत वाहन म्हणून कुत्रा आला होता. भगवान भैरव कुत्र्यावर बसले. भैरवाच्या हाती एक दंडुका होता. या दंडुक्याद्वारे भगवान भैरवाने ब्रह्मदेवाचे पाच पैकी एक डोके उडवले. तेव्हापासून ब्रह्मदेवाला फक्त 4 डोकी आहेत.
एक डोके गमावल्यानंतर ब्रह्मदेवाने भगवान शंकर यांची माफी मागितली. सर्व देवी देवता आणि साधू संत महंत यांची माफी मागितली. यानंतर भगवान भैरव शांत झाले. ही घटना कालाष्टमीच्या दिवशी घडली.
या ब्रँडची मूळ नावं माहिती आहेत का?