Supreme Court: मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेतील (Shiv Sena) तब्बल ४० आमदारांनी (MLA) बंडखोरी केली आणि भाजपच्या (BJP) साथीने त्यांनी सत्ता देखील स्थापन केलं. मात्र, हे सरकारच बेकायदेशीर असल्याची याचिका शिवसेनेकडून दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेली शपथ ही अधिकृत नसल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. याच याचिकेवर आज (3 ऑगस्ट) सुनावणी पार पडली. यावेळी नेमकं काय घडलं याबाबत जाणून घ्या सविस्तरपणे.
शिवनेतील एका आमदारांच्या मोठा गटाचा पाठिंबा असल्याने एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आपलं बहुमत देखील सिद्ध केलं. पण शिवसेनेने यावेळी असा दावा केला की, बहुमताच्या चाचणीसाठी ज्या आमदारांनी मतदान केलं त्यापैकी काही आमदार मुळातच पात्र नाहीत. कारण की, शिवसेनेने ४० पैकी १६ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाई करण्यात आली होती. आता याच आमदारांवर कोर्टाने अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणीची शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
अधिक वाचा: डोंबिवलीतील शिवसेना शाखेत जोरदार राडा, पाहा VIDEO
साधारण तासभरापेक्षा दोन्ही गटाचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी उद्या पार पडणार. उद्या सकाळी ही केस पहिलीच सुनावणीसाठी घेतली जाईल. कोर्टाने केलं स्पष्ट
अधिक वाचा: 'संजय राऊताचा अभिमान, हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक'
अधिक वाचा: 'राज्यपाल कोश्यारी अजगरासारखे सुस्त पडलेले असतात...'