नवी दिल्लीः अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थमंत्रालयाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत अर्थमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्यात. ज्यात एफपीआयपासून अधिभार काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी वाहन सेक्टर, एनबीएफसी, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि रेपो रेट यासंबंधीत बऱ्याच मोठ्या घोषणा केल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, लवकरच जीएसटी व्यवस्था सऱळ केली जाईल आणि सरकार ७० हजार कोटी रूपये पब्लिक सेक्टर बँकांना देणार आहे. अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये सरकारनं २ कोटी रूपयांपासून ५ कोटी रूपयांच्या टॅक्सेबल इन्कमवर सरचार्ज १५ टक्क्यांनी वाढून २५ टक्के केला होता. तर ५ कोटी रूपयांपासून अधिकच्या उत्पन्नावर १५ टक्क्यानं सरचार्ज वाढून ३७ टक्के केला आहे. जाणून घेऊया अर्थमंत्री निर्मला सीतारामननं आपल्या पत्रकार परिषदेत काय घोषणा केल्यात आहेत.