UP Elections 2022 : लखनौ : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. समाजवादी पक्ष ५-६ छोट्या पक्षांना घेऊन आघाडी उभारली असून निवडणुकीच्या लढाईत उतरले आहेत. तर दुसरीकडे एका नेत्याला पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. आदित्य ठाकूर असे या समाजवादी पक्षाच्या नेत्याचे नाव असून त्यांनी अंगावर रॉकेल टाकूल स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी त्यांना रोखले आणि पुढील अनर्थ टळला.
A Samajwadi Party worker allegedly tried to immolate himself outside party office in Lucknow claiming he was denied a ticket to contest in UP polls — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 16, 2022
"I have worked for the party in constituency 74 of Aligarh in the last 5 years. I want justice," says Thakur Aditya, SP worker pic.twitter.com/dRcqPKRJqt
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये सकाळी ११ च्या सुमारास समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर एकच गोंधळ उडाला. समाजवादी पक्षाचे नेते आदित्य ठाकूर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. ठाकूर हे अलीगढ जिल्ह्यातील छर्रा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. परंतु त्यांना तिकीट न मिळाल्याने ते अस्वस्थ झाले. त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आपण आयुष्यभर पक्षासाठी काम केले पण आपल्याला तिकीट मिळाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अलीगढ जिल्ह्यातील छर्रातून त्यांना तिकीट न मिळाले ते नाराज झाले. पोलिसांनी वेळीच त्यांना पकडले आणि आत्मदहनापासून रोखले. त्यांची मेडिकलसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
समजवादी पक्षाचे नेते आदित्य ठाकूर यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी लखनौमध्ये पक्षाच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना रोखले आणि पुढील अनर्थ टळला.#SamajwadiParty #UPElections2022 pic.twitter.com/M21Jd6lJ1f — Timesnowmarathi (@timesnowmarathi) January 16, 2022
ठाकूर आदित्य म्हणाले की मी माझे संपूर्ण आयुष्य पक्षासाठी दिले. गेल्या पाच वर्षापासून छर्रा मतदारसंघात काम केले. परंतु मला तिकीट नाही मिळाले. मला न्याय हवा अशी मागणी ठाकूर यांनी केली. आपल्यावर अन्याय झाला असून बाहेरच्या व्यक्तीला तिकीट दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
उत्तरप्रदेश योगी मंत्रिमंडळातील आतापर्यंत तीन मंत्री आणि 11 आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान आणि धरम सिंह सैनी यांचा समावेश आहे. पूर्ण यादी वाचा...