UPSC 2021 Result : नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे युपीएससी 2021चा निकाल (UPSC Result 2021) टॉपर्सच्या यादीसह प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने, UPSC ने आता निवडलेल्या उमेदवारांसाठी UPSC नागरी सेवा 2021 चे गुण प्रसिद्ध केले आहेत. युपीएससी 2021 परिक्षेची टॉपर असलेल्या श्रुती शर्माने एकूण 1150 गुण मिळवले आहेत आणि 54.57% सह अव्वल स्थान पटकावले आहे. खाली UPSC टॉपर्स 2021 चे गुण तपासा. संपूर्ण यादी देखील दिली आहे. (UPSC 2021 result declared, Topper Shruti Sharma scored 54.57%)
विशेष म्हणजे, युपीएससी परिक्षेत भारतात दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अंकिता अग्रवालने देशात पहिल्या आलेल्या श्रुती शर्माच्या तुलनेत व्यक्तिमत्व चाचणी फेरीत चांगले गुण मिळवले. मात्र, तिला मुख्य परिक्षेत तुलनेने कमी गुण मिळाले होते. अंकिताला 5 टक्क्यांपेक्षा जास्त 55 गुण कमी होते. तिने युपीएससी परिक्षेत 51.85% गुण मिळवले. युपीएससी परिक्षेत भारतात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गामिनीला 1045 गुण आणि 51.60% मिळाले. गामिनीला अंकितापेक्षा फक्त 5 गुण कमी मिळाले आहेत. खाली UPSC टॉपर्स 2021 चे गुण तपासा.
UPSC निकाल 2021 च्या संपूर्ण यादीसाठी PDF डाउनलोड करा: निवडलेल्या उमेदवारांचे गुण येथे युपीएससीच्या वेबसाईटवर पाहा आणि डाउनलोड करा.
UPSC 2021 टॉपर मार्क : पाहा कोणाला किती गुण मिळाले
रॅंक | नाव | मुख्य परीक्षा | व्यक्तिमत्व चाचणी | एकूण गुण | % गुण |
1 | श्रुति शर्मा | 932 | 173 | 1105 | 54.57 |
2 | अंकिता अगरवाल | 871 | 179 | 1050 | 51.85 |
3 | गामिनी सिंघला | 858 | 187 | 1045 | 51.60 |
4 | ऐश्वर्या वर्मा | 860 | 179 | 1039 | 51.31 |
5 | उत्कर्ष द्विवेदी | 871 | 165 | 1036 | 51.16 |
6 | यक्ष चौधरी | 879 | 154 | 1033 | 51.01 |
7 | सम्यक जैन | 838 | 193 | 1031 | 50.91 |
8 | इशिता राठी | 862 | 168 | 1030 | 50.86 |
9 | प्रीतम कुमार | 829 | 201 | 1030 | 50.86 |
10 | हरकिरत सिंह रंधावा | 831 | 195 | 1026 | 50.67 |
मिळालेल्या गुणांसह निवडलेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी आता येथे उपलब्ध आहे. UPSC ने या वर्षाचा कट ऑफ देखील जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या वर्षी शॉर्टलिस्ट केलेल्या शेवटच्या उमेदवाराला एकूण 689 किंवा 34.02% गुण मिळाले आहेत. PwBD-3 श्रेणीतील उमेदवार हा UPSC नागरी सेवा 2021 च्या यादीत अंतिम निवड करण्यात आलेला उमेदवार होता.
दरवर्षी देशातील लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयो म्हणजे युपीएससी (UPSC) द्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत उतरतात. ही परीक्षा पास करून आयएएस (IAS) किंवा आयपीएस (IPS)बनून उत्तम करियर घडवावे त्याचबरोबर देशाची सेवा करावी असे सगळ्यांना वाटत असते. मात्र परीक्षेला बसणाऱ्या किंवा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकालाच यश मिळत नाही. कारण या परीक्षेचा प्रकारच मुळी स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) असा आहे. यात जो यशस्वी होतो तो प्रेरणा बनतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजेच यूपीएसीने (UPSC)सोमवारी नागरी सेवा, 2021 चा अंतिम निकाल जाहीर केला. यात महाराष्ट्राच्या तरुणांनीही यश (UPSC Success) मिळवले आहे. कोल्हापूरच्या दोन इंजिनियरना (Engineers from Kolhapur)यात यश मिळाले आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील असणाऱ्या या दोन इंजिनियरसाठी त्यामुळे नागरी सेवांचे दरवाजे खुले झाले आहेत. स्वप्निल तुकाराम माने (Swapnil Tukaram Mane) याने तर यश कसे मिळवायचे याचा वस्तूपाठच घालून दिला आहे. परिस्थितीमुळे फळविक्रेता म्हणून काम केलेल्या जिद्दी स्वप्निलने आता सनदी अधिकारीपदावर झेप घेतली आहे. तर दुसरीकडे आशिष अशोक पाटील (Aashish Patil) या प्राथमिक शिक्षकाच्या मुलाने नेत्रदीपक यश मिळवले आहे.