PM Modi In Varanasi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi )आज त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले होते. PM मोदींनी काशीला 1800 कोटींची भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी अक्षय पात्र मिड डे मील किचनचे उद्घाटनही केले. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही (Yogi Adityanath) उपस्थित होते. यादरम्यान सरकारी शाळांतील मुलांना भेटून पंतप्रधान मोदींना खूप आनंद झाला. एका मुलाने त्यांच्यासमोर शिव तांडव स्तोत्राचे पठण सुरू केले तेव्हा पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त आनंद झाला. (watch video varanasi govt. school student started reciting shiv tandav stotra then pm modi did this read in marathi)
अधिक वाचा : 'काय झाडी, काय हॉटेल..' डायलॉग फेम शहाजीबापू थोडक्यात बचावले
वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा पीएम मोदींना भेटतो आणि तो शिव तांडव स्तोत्र म्हणू लागतो. एवढ्या लहान मुलाच्या तोंडून शिव तांडव स्तोत्र ऐकून पंतप्रधान मोदींना खूप गदगद झालेत. यानंतर, पंतप्रधानांनी त्याला जवळ घेतात आणि शिव तांडव स्तोत्र अतिशय लक्षपूर्वक ऐकू लागतात. यानंतर पीएम मोदी मुलाला प्रोत्साहन देतात. याशिवाय एका मुलीने माँ सरस्वतीची पूजा पीएम मोदींसमोर म्हणून दाखवली. या मुलांमध्ये पीएम मोदी खूप आनंदी दिसत होते.
#WATCH | Prime Minister Narendra Modi had a free-wheeling interaction with children in Varanasi pic.twitter.com/fncXna5a3A — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 7, 2022
त्यानंतर पीएम मोदी इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड कन्व्हेन्शन सेंटर-रुद्राक्ष येथे पोहोचले. तेथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी अखिल भारतीय शिक्षा समागमाचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी ज्या भूमीवर देशाचे महत्त्वाचे विद्यापीठ स्थापन झाले होते, त्या भूमीवर अखिल भारतीय शिक्षण परिषद आयोजित केली जात आहे. ते म्हणाले की, देशातील तरुणांवर मोठी जबाबदारी आहे. भारतात गुणवंतांची कमतरता नाही, पण संकुचित विचारसरणीतून शिक्षण काढून टाकण्याची गरज आहे.
अधिक वाचा : कियारा अडवाणी बॉयफ्रेंडसोबत गुपचूप गेली फिरायला?
मुलांचे मन समजून घेतले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण देणे आवश्यक आहे. पंतप्रधान म्हणाले की, आपल्याला स्वतःला बदलावे लागेल आणि यंत्रणा विकसित करावी लागेल. आपण केवळ पदवीधारक तरुण तयार करू नये, तर देशाला पुढे नेण्यासाठी जे काही मनुष्यबळ आवश्यक आहे ते द्यायला हवे. ते म्हणाले की, आपले तरुण कुशल, आत्मविश्वास, व्यावहारिक आणि गणनाक्षम असले पाहिजेत, यासाठी शैक्षणिक धोरण यासाठी पाया तयार करीत आहे.