Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी .
Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी .
दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करुन सरकार मार्ग काढेल परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये, असं आवाहन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद जळगाव याठिकाणी करण्यात आली आहे. काल येथील तापमान 5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. जळगावसोबतच उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला होता.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्याचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत राज्यपालांना ट्विटरवर ब्लॉक केले आहे. सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालच्या राज्यपालांच्या ट्विटमुळे मी नाराज झाले होते, त्यानंतर मी त्यांना ब्लॉक केले, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना धमकावत असल्याचा आरोपही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेराव घातला आहे. ऑनलाईन परीक्षा (घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला आहे. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे.
आज लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला आहे. यात कृषी क्षेत्रात काहीअंशी सकारात्मक वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये 2020-21 साली कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये 3.6 टक्के सकारात्मक वाढ झाली आहे.
आज देशाचे यश देशाच्या क्षमता आणि शक्यतांइतकेच अमर्याद आहेत. हे यश कोणत्याही एका संस्थेचे किंवा आस्थापनाचे नसून देशातील विविध नागरिकांचे आहे. यामध्ये कोट्यवधी देशवासीयांचे श्रम आणि घाम ओतला असून 2047 साली देश स्वातंत्र्याची शताब्दी पूर्ण करेल. त्यावेळच्या भव्य, आधुनिक आणि विकसित भारतासाठी आज आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. आपण आपले परिश्रम शेवटपर्यंत नेले पाहिजे आणि हे सुनिश्चित केले पाहिजे की शेवटी फायदेशीर परिणाम मिळतात. यात आपला सर्वांचा वाटा आहे आणि समान सहभाग आहे.
८३ एलसीए तेजस लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत करार करण्यात आला आहे. ऑर्डनन्स फॅक्टरींचे 7 संरक्षण PSU मध्ये रूपांतर करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. देशात 11 नवीन मेट्रो मार्गांवर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, ज्याचा दररोज 8 राज्यांतील लाखो लोकांना फायदा होत आहे.
वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी माझे सरकार सुमारे 4500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 7 मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल क्षेत्रे आणि परिधान पार्क उभारत आहेत. यामुळे देशात एकात्मिक वस्त्र मूल्य साखळी निर्माण होईल. माझे सरकार देशाच्या सुरक्षेसाठी निर्धाराने काम करत आहे. सरकारच्या धोरणांमुळे संरक्षण क्षेत्रात विशेषतः संरक्षण उत्पादनात देशाचा स्वावलंबीपणा सातत्याने वाढत आहे.
भारताचा अनमोल वारसा देशात परत आणण्यालाही सरकारचे प्राधान्य राहिले आहे. भारतातून शंभर वर्षांपूर्वी चोरीला गेलेली आई अन्नपूर्णा देवीची मूर्ती परत आणून काशी विश्वनाथ मंदिरात स्थापित करण्यात आली आहे.
'माझ्या सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे भारत पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. माझ्या सरकारच्या धोरणांमुळे आज भारत अशा देशांपैकी एक आहे जिथे इंटरनेटची किंमत सर्वात कमी आहे आणि स्मार्ट फोनची किंमत देखील सर्वात कमी आहे. भारतातील तरुण पिढीला याचा मोठा फायदा होत आहे.
राष्ट्रपती म्हणाले- 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत माझे सरकार सर्व गरीबांना दरमहा मोफत रेशन देत आहे. माझ्या सरकारने जन धन-आधार-मोबाईल म्हणजेच जेएएम ट्रिनिटीला नागरिक सशक्तीकरणाशी ज्या प्रकारे जोडले आहे, त्याचा परिणामही आपण सतत पाहत आहोत. 44 कोटींहून अधिक गरीब देशवासियांना बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे, महामारीच्या काळात करोडो लाभार्थ्यांना थेट कॅश ट्रान्सफरचा लाभ मिळाला आहे. डिजिटल इंडिया आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढत्या प्रसाराच्या संदर्भात देशातील UPI प्लॅटफॉर्मच्या यशासाठी सरकारच्या दूरदृष्टीची मी प्रशंसा करेन. डिसेंबर 2021 मध्ये देशात UPI द्वारे 8 लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाले आहेत.
राष्ट्रपती म्हणाले, 'माझ्या सरकारच्या संवेदनशील धोरणांमुळे आता देशातील सर्वसामान्यांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध होत आहेत. 80 हजारांहून अधिक आरोग्य आणि वेलनेस सेंटर्स आणि कोट्यवधी आयुष्मान भारत कार्डने गरीबांना त्यांच्या उपचारात मदत केली आहे. सरकारने 8000 हून अधिक जनऔषधी केंद्रांद्वारे स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून उपचाराचा खर्च कमी केला आहे.
संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वप्रथम स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही २५ वर्षांच्या संकल्पांना आकार देण्याची संधी आहे. 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' या मूळ मंत्राने आपले सरकार चालत आहे. कोरोना महामारीने शास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि राज्य सरकार यांना एक संघ म्हणून काम करायला लावले आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर कमी होत असल्याचे चित्र आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 2 लाख 9 हजार 918 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. सध्या देशात 18 लाख 31 हजार 268 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
बहुचर्चित बिग बॉस 15 सिझनला विजेती मिळाली असून तेजस्वी प्रकाशने जेतेपदाचा चषक आपल्या नावावर केला आहे. तेजस्वी प्रकाश आणि प्रतिक सेहजपाल या दोघांमध्ये अंतिम लढत होती.