Panipuri : कुंतीनं चॅलेंज दिलं आणि द्रौपदीने पाणीपुरी तयार केली, वाचा पाणीपुरीचा महाभारत काळाशी असलेला संबंध

Story of Panipuri : पाणीपुरी या पदार्थाचे नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले असेल. भारतात प्रचंड लोकप्रिय असलेल्या या पदार्थाला मोठा इतिहास असे सांगतात. महाभारत काळात पाणीपुरी हा पदार्थ पहिल्यांदा खाल्ला गेला अशी एक कथा सांगतात. ही गोष्ट किती खरी हे आज सांगणे कठीण आहे. पण पाणीपुरी या पदार्थाने भारतीयांची मनं जिंकली आहे यात तिळमात्र शंका नाही. तर अशा या पाणीपुरीचा पांडवांशी असलेला संबंध जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल तर ही कथा पुढे वाचा...

Updated Jun 1, 2023 | 08:23 PM IST

Panipuri

Panipuri

Story of Panipuri in Marathi : महाभारत काळात द्युताच्या खेळात पराभव झाला. कौरवांनी पांडवांची सगळी संपत्ती जिंकली आणि त्यांना वनवासाला पाठवून दिले. वनवासात असतानाच्या काळात पांडवांकडे जगण्यासाठी अतिशय मर्यादीत साधने उपलब्ध होती. उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करून पांडव वनवासात आयुष्य व्यतीत करत होते.
वनवासातील नवनव्या आव्हानांना सामोरे जात आणि प्रत्येक कठीण परिस्थितीतून मार्ग काढत पांडव जगत होते. अशातच एक दिवस पांडवांच्या जंगलातील घरात अर्थात पर्णकुटीत अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. मर्यादीत अन्न होते. या अन्नातून स्वयंपाक करायचा होता. घरात कुंती, द्रौपदी आणि पांडव असे सात सदस्य होते. सर्वांसाठी जेवण तयार करणे आवश्यक होते.
पांडव पत्नी द्रौपदी हिला तिची सासू कुंती हिने एक आव्हान दिले. मोजक्याच साधनांचा वापर करून जेवण तयार करायचे आहे. कसेही करून हे जमव असे कुंतीने द्रौपदीला सांगितले. कुंतीने द्रौपदीला स्वयंपाक करण्यासाठी थोड्या थोड्या प्रमाणात वेगवेगळ्या भाज्या, पाणी आणि पुऱ्या तयार करण्याचे पीठ एवढेच पदार्थ दिले होते. हे साहित्य मिळाल्यावर द्रौपदीला प्रश्न पडला आता करावे काय. बराच वेळ विचार केल्यावर द्रौपदीने स्वयंपाक करण्यास सुरुवात केली.
पाटा वरवंटा वापरून सर्व भाज्या रगडून द्रौपदीने चटणी तयार केली. ही चटणी पाण्यात मिसळल्यावर पाण्याला अनोखी चव आली. हे बघितल्यावर द्रौपदीला उत्साह वाढला. मग काय तिने पीठ आणि पाणी यांच्या मिश्रणातून कणीक मळली. कणकेच्या पुऱ्या करून त्या तळल्या. स्वयंपाक होत आला होता त्याच सुमारास पांडव घरी आले. आता द्रौपदीची खरी परीक्षा होती. द्रौपदीने केलेला स्वयंपाक पांडवांना कसा वाटतो हे जाणून घेण्यास कुंती पण उत्सुक होती.
पांडव जेवणासाठी हात पाय धुऊन पाटावर बसले. द्रौपदी पदार्थ घेऊन वाढण्यासाठी आली. तिने प्रामाणिकपणे घरातली अडचणी आणि त्यावर काढलेला मार्ग याची माहिती पांडवांना दिली. नंतर जेवण वाढण्यास सुरुवात केली. द्रौपदीने पहिल्यांदा एक पुरी हाती घेतली. थोडी फोडली. या पुरीत तिने एका चमच्याने भाज्यांची चटणी मिसळून तयार केलेल्या अनोख्या चवीचे पाणी ओतले. नंतर ही पुरी धर्मराजाला अर्थात युद्धिष्ठिराला खाण्यासाठी दिली. ही पुरी युद्धिष्ठिराने खाल्ली आणि त्याला आवडली. यानंतर क्रमाक्रमाने सर्व पांडवांनी चविष्ट पाण्यासोबत पुऱ्या खाल्ल्या. हाच तो पाणीपुरीचा पहिला प्रयोग होता. पांडवांना स्वयंपाक आवडला हे बघून कुंतीला समाधान वाटले. आता तिनेही द्रौपदीने केलेला स्वयंपाक चाखून बघितला. तिलाही हा प्रयोग आवडला. अशा प्रकारे पाणीपुरीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला. या निमित्ताने पहिल्यांदा पाणीपुरी खाल्ली गेली. पुढे काळ बदलत गेला तसे पाणीपुरीच्या तंत्रात थोडे बदल झाले. यातून आताची पाणीपुरी तयार झाली. पण पाणीपुरीची निर्मिती वनवासात असताना पांडवांसाठी द्रौपदीनेच सर्वात आधी केली असे सांगतात.
पाणीपुरीची ही गोष्ट किती खरी हे सांगणे कठीण आहे. पण पाणीपुरीची ही कथा आजही अनेकजण ऐकवतात आणि ऐकणारे आनंदाने ऐकतात. म्हणूनच असं म्हणतात की खरे खोटे माहिती नाही पण भारतीयांसाठी पाणीपुरी ही जीव की प्राण झाली आहे. समारंभात कितीही छान पदार्थ असले तरी पाणीपुरीकडे असलेला अनेकांचा ओढा आजही कमी होताना दिसत नाही.
जशी पांडवांची भूक भागवण्याच्या निमित्ताने द्रौपदीला पाणीपुरी लाभली तशीच आपल्यालाही ती लाभो. पाणीपुरी खाण्याच्या निमित्ताने आपल्या जीवनातील आनंद वाढो.
ताज्या बातम्या

Matheran News: किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेली महिला 700 फूट दरीत कोसळली, पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं

Matheran News     700

Mahaparinirvan Diwas Special Train : महापरिनिर्वाण दिनासाठी 5 डिसेंबरला मुंबईसाठी विशेष ट्रेन अनारक्षित, 7 डिसेंबरला परतणार

Mahaparinirvan Diwas Special Train    5      7

शहर किंवा गावाच्या नावापुढे 'पूर' का लिहिले जाते? जाणून घ्या रंजक कारण

Mahaparinirvan Din Motivational Quotes in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या 10 प्रेरणादायी विचारांनी जीवनात होईल क्रांती

Mahaparinirvan Din Motivational Quotes in Marathi      10

Crime News : 4 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह बाजूच्या खोलीत सापडला, हत्येचा संशय

Crime News  4

Nashik City Link Bus : सिटी लिंक बस सेवा फसवी, शंभर टक्के सेवा देण्याचा दावा फोल

Nashik City Link Bus

Maharashtra Politics: एकनाथ खडसेंच्या कार्यकाळात 6.60 कोटींचे नुकसान - मंगेश चव्हाण

Maharashtra Politics    660   -

Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी संदेश, Whatsapp Messages द्वारे महापुरुषाला करा विनम्र अभिवादन

Mahaparinirvan Din 2023         Whatsapp Messages
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited