100 percent electrification of broad gauge railway route in Maharashtra will be done within a year : महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या (2023) अखेरपर्यंत करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. महाराष्ट्रात सध्या 8 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया सुरू आहेत. आता 10 फेब्रुवारीला आणखी दोन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.
भारतात लवकरच 400 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया धावतील. यातील 8 वंदे भारत रेल्वेगाड्या महाराष्ट्रात आहेत. येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन नव्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांची संख्या 10 होणार आहे.
Bus Accident : पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा अपघात, 4 ठार