11 Die Due To Heat Stroke Details In 10 Points : उष्माघाताने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 11 मृत्यू, 10 मुद्यांमध्ये जाणून घ्या सर्व माहिती

11 died during maharashtra bhushan award ceremony due to heatstroke, details in 10 points : ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवार 16 एप्रिल 2023 रोजी नवी मुंबई येथील खारघर येथे पार पडला.

11 died during maharashtra bhushan award ceremony due to heatstroke, details in 10 points
उष्माघाताने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 11 मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उष्माघाताने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 11 मृत्यू
  • अकरा मृतांपैकी 8 महिला आणि 3 पुरुष
  • उष्माघाताने मृत्यू झालेल्या 11 पैकी 8 सदस्यांची नावं प्रशासनाने जाहीर केली

11 died during maharashtra bhushan award ceremony due to heatstroke, details in 10 points : ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवार 16 एप्रिल 2023 रोजी नवी मुंबई येथील खारघर येथे पार पडला. याप्रसंगी चार ते पाच तास उन्हात बसल्याने अकरा श्री सदस्यांचा मृत्यू झाला. श्री सदस्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात असल्याचे सांगण्यात आले. अनेकांना वैद्यकीय उपचार करून घरी पाठवण्यात आले. हे सर्व कसे घडले हे जाणून घ्या फक्त 10 महत्त्वाच्या मुद्यांत...

  1. नवी मुंबई येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. कार्यक्रम सुरू झाला त्यावेळी तापमान 37 अंश सेल्सिअस होते. 
  2. कार्यक्रमासाठी रणरणत्या उन्हात डोक्यावर छप्पर नसताना तासनतास बसून राहिल्यामुळे अकरा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला.
  3. उष्माघातामुळे 11 मृत्यू. कळंबोलीच्या MGM हॉस्पिटलमध्ये (महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल) 20 जणांवर उपचार सुरू आहेत आणि 24 जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.
  4. अकरा मृतांपैकी 8 महिला आणि 3 पुरुष आहेत.
  5. मृतांपैकी 8 जणांची ओळख पटली. इतर 3 जणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू.
  6. उष्माघाताने मृत्यू झालेल्या 11 पैकी 8 सदस्यांची नावं प्रशासनाने जाहीर केली आहेत. श्रीमती वायचळ, तुकाराम वांगडे, महेश गायकर, मंजुषा भाबंडे, स्वप्नील केणे, संगीता पवार, जयश्री पाटील, भीमा साळवी अशी ही नावं आहेत. 
  7. कार्यक्रमस्थळी अपेक्षेपेक्षा जास्त असा लाखोंचा जनसमुदाय आला होता. यामुळे उष्णता आणि आर्द्रता जास्त जाणवत होती.
  8. कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गर्दीच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याची सोय आणि वैद्यकीय मदत केंद्र ही व्यवस्था अपुरी होती. 
  9. मृतांच्या नातलगांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर. सर्व अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारांचा खर्च राज्य शासन करणार.
  10. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी "हरवले व सापडले" समितीचे प्रमुख (संपर्क क्रमांक : 7977314031) आणि तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाकडे संपर्क (संपर्क क्रमांक : 022-27542399) साधावा असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाने केले. 

अभिनेत्रीच्या लग्नाची गोष्ट

छान किती दिसती साराच्या या अदा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी