मुंबई : राज्यात कोरोना (corona) आणि ओमिक्राॅन (omicron) रुग्णांची सध्याची संख्या वाढत आहे. नववर्षाचे स्वागत करीत असताना लोक मोठ्या संख्येने घराच्याबाहेर पडतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा (The third wave) धोका लक्षात घेता शासनाने नववर्षाच्या स्वागतावर निर्बंध आणले आहेत, त्यामुळे लोकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे (new year) स्वागत करावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (home minister dilip valase-patil) यांनी केले आहे. (Action if more than five people gather for New Year's reception, Home Minister Dilip Walse Patil's warning)
नव्या व्हेरिएंटमुळं करोनाचा धोका आणखी वाढला असून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं काही कठोर निर्णय घेतले आहेत. राज्यात टप्प्याटप्प्यानं अनलॉक करण्यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यामुळं राज्यातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. करोनाचा (Coronavirus) राज्यातील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरु शकणाऱ्या मुंबईत कठोर निर्बंध लादण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पोलिसांकडून शहरात आठ दिवसांची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत (7 जानेवारी) मुंबईत जमावबंदी कलम १४४ लागू असेल. या काळात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही.
वळसे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात करोनाची संख्या वाढत आहे. ओमिक्राॅन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटनाला व सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. विवाह समारंभात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, हॉटेल व्यवस्थापन व मंगल कार्यालयांनी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. जे नियमांची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे, जबाबदारीने वागणे यामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येईल.