नांदेड : सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केसीआर यांची त्यांच्या तेलंगणा राज्याबाहेर नांदेडमध्ये पहिलीच सभा झाली. यावेळी केसीआर यांनी, 'अबकी बार किसान सरकार'.. असा नारा देत आता आपल्याला राष्ट्रीय पातळीवर जायचे आहे, असे संकेत दिले आहेत. यानंतर केसीआरने देशाच्या इतर भागातही रॅली काढण्याची योजना आखली आहे. (KCR steps into Maharashtra politics, Ab Ki Baar Kisan Sarkar slogan)
अधिक वाचा : भारताचा चीनवर पुन्हा डिजिटल स्ट्राईक; 232 मोबाइल अॅप्सवर बंदी
नांदेडमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले की, बरेच लोक येतात आणि लांबलचक भाषणे देऊन निघून जातात. 'मन की बात' करून ते निघून जातात. 75 वर्षांनंतरही देशाला पाणी, वीज मिळत नाही. देशात पोकळ भाषणे सुरू आहेत, शेतकऱ्यांकडे कोणाचे लक्ष नाही.
अधिक वाचा : Parvez Musharraf death: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन
केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करताना बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव म्हणाले, आज मेक इन इंडिया हा विनोद बनला आहे. मेक इन इंडिया कुठे गेला? सर्व काही चीनमधून येत आहे. प्रत्येक गल्लीत चायना मार्केट आहे. मेक इन इंडिया असेल तर चीनच्या बाजारपेठेऐवजी भारताची बाजारपेठ स्थापन झाली पाहिजे. केसीआर म्हणाले, जर तुम्ही किसान सरकार, बीआरएस सरकार बनवले तर दोन वर्षांत तुम्ही देशाचे नाव उजळेल.