Appasaheb Dharmadhikari: श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू, आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले...

Appasaheb Dharmadhikari first reaction after death of shree sevak due to heatstroke: नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी उपस्थित होते. त्यापैकी दहाहून अधिक अनुयायांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या घटनेनतंर आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Maharashtra Bhushan Appasaheb Dharmadhikari reaction after death of shree sevak due to sunstroke in kharghar navi mumbai read in marathi
श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्यावर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले... 
थोडं पण कामाचं
  • खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताचा अनेकांना त्रास
  • उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू तर अनेकजणांना रुग्णालयात दाखल करावे लागले
  • या घटनेनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे

Appasaheb Dharmadhikari : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील 13 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

हे पण वाचा : या 10 भाज्या आहेत कॅन्सरच्या शत्रू, खाल्ल्यास कर्करोगाचा धोका होईल दूर

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एक पत्रक काढून निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं, "महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्याठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दु:ख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे."

हे पण वाचा : या सवयींमुळे ऐन तारुण्यात येतो हार्ट अटॅक, तुम्हाला आहेत का या सवयी?

राज्य शासनाकडून मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत

उष्माघातामुळे श्री सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं, मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल.

हे पण वाचा : हे 7 पदार्थ खाल तर बनाल शक्तिमान

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी