Maharashtra unseasonal rain: राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस, पुढील 3 तासांत 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासांत राज्यातील काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra weather forecast imd predicts intense thunderstorm in some districts read in marathi
Maharashtra unseasonal rain: राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस, पुढील 3 तासांत 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस
  • अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान

Maharashtra Weather Forecast updates: राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत असल्याचं दिसत आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. होळीच्या दिवशी राज्यातील अनेक भागांत पाऊस बरसल्यानंतर आता धूलिवंदनाच्या दिवशीही अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासांत राज्यातील काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : जास्त तहान लागणे आजारपणाचे लक्षण?

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यावर तीव्रतेचे ढग असून. नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पश्चिम विदर्भाचा काही भाग, तसेच मराठवाड्यातही मध्यम ते तीव्र ढग आहेत. पुढील तीन ते चार तासांत या भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि आसपासच्या शहरांत पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत अंशत: ढगाळ आकाश आणि हलका पाऊस / मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 50-60 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : Rang Panchami: रंगांची एलर्जी असल्यास काय करावे?

7 मार्च हवामानाचा अंदाज 

नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा : स्वप्नात फळे दिसणे शुभ की अशुभ?

शेतीचे मोठे नुकसान

रविवारी रात्रीपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात पावसासोबतच गारपीट सुद्धा झाली. या अवकाळी पावसामुळे कांदा, हरभरा, गहू तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्याच्या सुरुवातीला रब्बी हंगामातील पिके काढण्यात येतात मात्र, त्याचवेळी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी