मुंबई : राज्यात रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची कामे सुरू असताना मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक गावांमध्ये गारपिटीनेही झोडपून काढलं आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह तुफान पाऊस कोसळला. यामध्ये धाराशिव, बीड, लातूर, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसंच परिणामी शेतातील उभी पिकं उद्ध्वस्त झाली आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात प्रचंड वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (Rabi crops have been affected due to unseasonal rains and hail in many parts of the state)
अधिक वाचा : सोन्याचे पोहचले ऑल टाईम हाय अगदी जवळ, जाणून घ्या आता काय भाव
हवामान विभागाने येत्या काही दिवसांत भारताच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अधिक वाचा : बाबा बागेश्वर मुंबईत येताच काय झालं?
मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, जालना तसेच उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागांतही वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात गारा पडल्या. या पावसासोबतच मोठ्या प्रमाणात गारांचा देखील वर्षाव होत होता. यात आंबा, कांदा, ज्वारी, गहू या पिकांचे नुकसान झाले. पाऊस उघडल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केल्यावरच नुकसानीचे स्वरूप लक्षात येईल. या गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला असून हाता-तोंडाशी आलेलं पीक या गारपिटीने गेलं आहे.