Maharashtra Water Crisis : मुंबई : राज्यात सर्व धरणात २६ टक्के पाणीसाठा उरला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राज्यात ४ हजारहून अधिक टँकर्सने पाणी पुरवठा केला जातो. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका कोकणाला बसत आहे. कोकणातील १८२ गाव आणि ५७२ वाड्यांना १०६ टँकर्सने पाणी पुरवठा केला जात आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ५१५ गावे आणि ११८० वाड्यांना ४४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये कोकण विभागात १८२ गावे आणि ५७२ वाड्यांना १०६ टँकर्सद्वारे, नाशिक विभागात १२६ गावे आणि २३४ वाड्यांना १०५ टँकर्सद्वारे, पुणे विभागात ७५ गावे आणि ३४२ वाड्यांना ८० टँकर्सद्वारे, औरंगाबाद विभागात ५४ गावे आणि ३२ वाड्यांना ७३ टँकर्सद्वारे, अमरावती विभागात ७५ गावांना ७५ टँकर्सद्वारे, नागपूर विभागात ३ गावांना ३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.
राज्यात मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात सध्या २६.२८ टक्के पाणीसाठा उरल आहे. राज्यात मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात २ जून २०२२ रोजीच्या आकडेवारीप्रमाणे २६.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये अमरावती विभागात ३२.३० टक्के, औरंगाबाद विभागात २९.५८ टक्के, कोकण विभागात ३८.४७ टक्के, नागपूर विभागात २८.५४ टक्के, नाशिक विभागात २४.०९ टक्के, पुणे विभागात २०.४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.