Adarsh award will be given to women sarpanches औरंगाबाद : ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यातील महिला सरपंचांसाठी शासनाने आदर्श (Adarsh Mahila Sarpanch Award) रस्कार देण्याची घोषणा केली असल्याचं म्हटलं आहे. औरंगाबादमधील एक परिषदेत सत्तार (Abdul Sattar) यांनी यासंबंधीची घोषणा केली. जिल्हा परिषदेच्या वतीने आज औरंगाबादमध्ये महिला सरपंच परिषदेचे (Mahila Sarpanch Parishad) आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री सत्तार बोलत होते. यावेळी, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर , रोहयो मंत्री संदिपान भुमरे हे उपस्थित होते. सदर परिषद शहरातील तापडिया नाट्यमंदिरात पार पडली.
येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. राज्य आणि जिल्हा पातळीवर आदर्श महिला सरपंच पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे. पहिला पुरस्कार २५ लाख रुपये रोख रकमेचा असेल. तसेच आणखी पाच जणांना आदर्श सरपंचाचा पुरस्कार देण्यात येईल. तसचं या पुरस्काराचे नाव स्व. मीनाताई ठाकरे आदर्श महिला सरपंच पुरस्कार असे असेल. अशी माहिती ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
१ ) पहिला पुरस्कार २५ लाख रुपये रोख रक्कमेचा पुरस्कार ज्याचे नाव आदर्श सरपंच पुरस्कार
२ ) दुसरा पुरस्कार २० लाख रुपये रोख रक्कम
३ ) तिसरा पुरस्कार १० लाख रुपये रोख रक्कम
४ ) चौथा पुरस्कार ०५ लाख रुपये रोख रक्कम
५ ) पाचवा पुरस्कार ०५ लाख रुपये रोख रक्कम