उस्मानाबाद - कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास (Shivsena Mla kailas patil) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कधी अमिषे ऑफर दिली जात आहेत तर कधी दबाव टाकून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचा गौप्यस्फोट कैलास पाटील यांनी केला केला आहे. मात्र, मी कितीही दबाव आला आणि कितीही आमिष दाखवले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) आणि शिवसेनेसोबतच राहणार असल्याचं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे. कैलास पाटील हे शिंदे गटाच्या तावडीतून निसटून आलेले एकमेव आमदार असून, ते आजतागायेत देखील शिवसेनेसोबत आहेत. अनेक आमदारांनी सुरुवातीपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत असण्याचा दावा केला होता. परंतु ते नंतर शिंदे गटात सामील झाले. मात्र, कैलास पाटील हे शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले आहेत. कितीही ऑफर आल्या दबाव आला तरी शिवसेना सोडणार नसल्याचा खुलासा आमदार पाटील यांनी केला. आजही काही सहकारी आमदार यांच्यामार्फत निरोप येतात, सगळेच निरोप जाहीर सांगायचे नसतात असे सांगत त्यांनी काय ऑफर व निरोप दिला जातोय हे गुलदस्त्यात ठेवले आहे. तुळजापुर येथे युवा सेनेच्या मेळाव्यात बोलताना आमदार कैलास पाटील यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला यावेळी युवासेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई, खासदार ओमराजे निंबाळकर हे उपस्थित होते.
अधिक वाचा : पारंपारिक बंगाली स्टाईलनं पार पडला बिपाशा बासूचा बेबी शॉवर
शिवसेनेतील निष्ठावान आजही शिवसेनेच्याच बाजुने असल्याचे सांगताना उध्दव ठाकरे हे नेहमी कैलास पाटील यांच उदाहरण देत असल्याचे आपण पाहतो. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुरतला जाताना कैलास पाटील हे रस्त्यातूनच परत आले होते. आपल्याला फसवून नेल्याचा सांगत कैलास पाटील तात्काळ मातोश्रीवर दाखल झाले होते यानंतर या सुटकेची व घटनेची मोठी चर्चा झाली होती. त्याच कैलास पाटील यांनी आपल्याला आणखीही ऑफर येत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र, आपण शिवसेनेसोबत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा ; Asia Cup : आफ्रिदीच्या लेकीनं भर मैदानात फडकावला तिरंगा
दरम्यान, पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले कि, शिवसेनेने आम्हाला ओळख दिली, उमेदवारी तिकीट दिले त्यामुळे आम्ही खुर्चीवर बसू शकलो. सर्वसामान्य जनता व शिवसैनिक यांच्या मतांवर आम्ही आमदार खासदार लोकप्रतिनिधी झालो आहोत. शिवसेनेने आम्हाला ओळख करुन दिली आणि ज्यांनी ओळख करुन दिली त्यांच्याशी कधीही प्रतारना करायची नाही, कितीही अमिषे आली तरी मी व खासदार ओमराजे हे शिवसेना सोडणार नाही. काही नेते जरी सोडून गेले तरी सामान्य जनता शिवसेनेच्या व उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे व राहणार असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा : नंदुरबारच्या चरणमाळ घाटात लक्झरीला भीषण अपघात