नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत या गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. हळद शिजवताना कूकरमधून पाण्याची गळती झाल्याने कुकरचा स्फोट झाला. स्फोटात एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनील मारवाड असं कुकरच्या स्फोटात मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. दरम्यान, सदर घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उदगीर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अधिक वाचा ; सभेला अद्याप परवानगी नाही,मनसे 'हा'निर्णय घेण्याच्या तयारीत
दरम्यान, कच्ची हळद शिजवताना सुनील मारवाड या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घडलेली घटना अशी आहे की, सुनील मारवाड हे कच्ची हळद शिजवत होते. यावेळी त्यांना कुकरमधून पाणी गळत असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर ते पाणी नेमकं का गळतंय हे पाहण्यासाठी कुकरजवळ गेले. जसेचं शेतकरी सुनील मारवाड हे कुकरजवळ गेले, यादरम्यान दुर्दैवाने कूकरचा मोठा स्फोट झाला. ज्यावेळी कुकरचा मोठा स्फोट झाला तेव्हा सुनील मारवाड हे कुकरच्या अगदी जवळ होते. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा स्फोट एवढा भयंकर होता की, कूकरचे अक्षरशः तुकडे तुकडे होऊन दूरवर अंतरावर जाऊन पडले. आणि सदर घटनेत सुनीलची पत्नी, मुलगा आणि अन्य एक मजूर असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कच्ची हळद शिजवणं सुरु असल्याने सुनील मारवाड यांची पत्नी आणि मुलगा हे सर्व कुटुंब शेतातच वास्तव्यास होते. जे हळद शिजवणे, काढणे या कामात त्यांना मदत करत होते. परंतु कुकरचा स्फोट झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक वाचा ; एका उंदराने एअर इंडियाच्या विमानात घातला धुमाकूळ
शेतकरी अनेक पिकं घेतो मात्र, त्याला फायदा सर्व पिकांमधून होत नसून, अगदी कधीतरी कुठल्या पिकला चांगला भाव मिळतो. दरम्यान, सध्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला सोन्याचा भाव आला असल्याने, अनेक शेतकरी हळद या पिकाकडे वळली असल्याचं दिसून येत आहे. हळदीला चांगला भाव आल्याने शेतकरी वर्गात मात्र आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे, ग्रामीण भागात हळद काढणीस मोठा वेग आला आहे. ज्यात हळद काढणी, शिजवणे, वाळवणे, ढोल करणे या कामांना गती आल्याचे पाहावयास मिळत आहे. हळद काढणीच्या या हंगामात शेतकरी आपल्या पूर्ण परिवारासह शेतातच ठाण मांडून या हळदीला सोनेरी झळाळी देण्यासाठी अहोरात्र कष्ट करताना आपल्याला पहायला मिळत आहे.
अधिक वाचा ; नारळ पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात फलदायी पेय?