उस्मानाबाद : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचर नेते नवाब मलिक यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल १५० एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. नवाब मलिक यांच्या तब्बल ५ संपती आज ईडीने जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील दुमाले जवळा येथे असलेली १५० एकर जमीन ईडीने केली केली आहे. जमीन खरेदी करताना मूल्यांकन कमी दाखवून जमीन खरेदी केली शिवाय मलिक हे शेतकरी नसताना त्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून ही जमीन खरेदी केली असल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला होता.
अधिक वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर मराठी शुभेच्छा
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील जमीन ही नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने आहे. मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान , फराज नवाब मलिक व बुश्रा फराज या व्यक्तींच्या नावाने मलिक जमीन खरेदी केली होती. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करित जप्तीची कारवाई असल्याची माहिती मिळत आहे.
अधिक वाचा : घर, मंदिरात संध्याकाळी करताय पुजा? या गोष्टी ठेवा लक्षात
सदर जमीन् बागायती असताना कोरडवाहू जमीन दाखवून मूल्यांकन १ कोटी २० लाखाने कमी केले असून, कागदोपत्री २ कोटी ७ लाखला जमीन खरेदी केल्याचे नमूद केले मात्र प्रत्यक्षात जास्त रक्कम दिली गेल्याचा आरोप आहे. १५० एकर जमीन् खरेदी करताना आला पैसा कुठून? हा पैसा बेनामी असल्याचा आरोप असून ही संपत्ती जप्त केली आहे.
अधिक वाचा : डॉ. बाबासाहेबांची 11 गीत, ऐकून अंगावर येतील शहारे