MP Pritam Munde lashed out at journalists: बीड : भाजपच्या खासदार (BJP MP) डॉ. प्रीतम मुंडे (Dr. Pritam Munde) या आपल्या शांत आणि संयमी स्वभावामुळे ओळखल्या जातात. त्यांची भाषणंही सौम्य भाषेत असतात. मात्र, याच प्रीतम मुंडे पत्रकारांवरच भडकल्याचं आज पाहायला मिळालं. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रीतम मुंडे भडकल्या. पत्रकारांना एकप्रकारे त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुण देण्याचा प्रयत्न प्रीतम मुंडे यांनी केला. त्या आज बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
बीड जिल्ह्यात देवस्थानच्या जमिनीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. तुम्ही मंदिर उघडावेत यासाठी आग्रही होता आणि त्यानंतर सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिली. मात्र त्याच मंदिरांच्या हडप केलेल्या जमिनीसाठी आपण आंदोलन करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावर खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, की जिथे-जिथे अन्याय होताना दिसतो, तिथं तिथं आवाज उचलेन. हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते आम्ही निश्चित करू’. असं उत्तर मुंडे दिले. परंतु मुंडे यांच्याकडून देण्यात आलेल्या उत्तरावर पत्रकार समाधानी नव्हता, म्हणून त्या प्रतिनिधींनी पुन्हा प्रश्न केला. पण खासदार प्रीतम मुंडे माध्यमांवर भडकल्या.
‘ऑन द रेकॉर्ड आणि ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला कसं वाजवायचे तसं वाजवा. खासदार म्हणून जशी माझधी जबाबदारी, तशीच पत्रकार म्हणून तुमची जबाबदारी आहे. विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला खासदारांचा आवाज सक्षम वाटत नसेल तर मला माफ करा, मीडिया म्हणून मलाही तुमचा आवाज सक्षम वाटत नाही’, अशा शब्दात प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.
प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. स्वत:चा दोष दाखवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम राज्य सरकार करते. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्याचे पाप या राज्य सरकारने केले. जर सगळे दोष केंद्राचे असतील तर राज्य चालवण्यासाठीही केंद्राकडे द्या, असा जोरदार टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला.
‘नाचता येईना, अंगण वाकडं’ असं राज्य सरकारचं काम आहे. नव्या गाड्या, बंगल्यांची डागडुजी करण्यासाठी पैसे आहेत. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत. रोज सकाळी पत्रकारांसमोर विचार मांडायचे आणि राजकीय टिप्पणी करायची असं काम या सरकारचं सुरू आहे. समाजातील कुठलाही वर्ग या सरकारच्य कामगिरीवर समाधानी नसल्याचं प्रीतम मुंडे म्हणाल्या.