Cabinet Expansion : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं. यानंतर वादळी वेगाने राज्यातील राजकारणात घडामोड होत शिंदे-फडणवीस सरकार आलं. त्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु बाकी मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यानं आमदारांचा शपथविधी बाकी राहिला आहे.
Read Also : Electric highway नाम तो सुना होगा; नाही, मग फायदेही ऐका
दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एरव्ही आम्हाला मार्गदर्शन करणारे राज्यपाल आता कुठे गेले? असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला आहे. तसेच, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गट फुटेल, असं म्हणत खैरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन बारा दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही मुख्यमंत्री कार्यालय सुरू झालेलं नाही. राज्यातील नागरिकांना त्यांच्या समस्यांवर दाद मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आशेचा किरण असतं. पण गेल्या 12 दिवसांपासून मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारीच उपस्थित नाहीत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.