मुंबई: विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव संमत झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी शिवसेना नेतृत्वासोबत अनेक नेत्यांना देखील चिमटे काढले, टीका केली. मात्र, याचवेळी भाषणात आपल्या दोन मुलांच्या मृत्यूची आठवण काढत एकनाथ शिंदे हे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांचं हे भावूक होणं म्हणजे नैतिकतेचं अधिष्ठान प्राप्त व्हावं यासाठी आणलेला आव असल्याची टीका केली आहे.
राणे आणि भुजबळ यांनी पक्ष सोडल्यानंतर विधानसभेत असेच संगीत नाटक केले होते त्यापेक्षा शिंदे यांचे नाटक वेगळे नव्हते अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
दुसरीकडे आता भाजप संजय राठोड, प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव दाम्पत्यांना शुद्ध करुन घेतले असून त्यांच्या प्रतिमा पुजेसाठी ठेवल्या असल्याची अत्यंत बोचरी टीकाही यावेळी केली आहे.
पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
अधिक वाचा: उद्धव ठाकरेंच्या हातातून धनुष्यबाणही जाणार; तर गुलाबराव म्हणतात, खरी शिवसेना आमचीच
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.