गुलाम नबी आझादांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना संपवण्याचे प्रयत्न

ghulam nabi azad resignation : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाच्या राजीनाम्याबाबत विचारले असता चव्हाण यांनी या ज्येष्ठ राजकारण्याचे जाणे दुर्दैवी असल्याचे म्हटले. ते म्हणाले की आझाद हे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते आणि धर्मनिरपेक्ष चेहरा आहेत.

Former Union Minister Prithviraj Chavan targeted the Gandhi family.
गुलाम नबी आझादांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना संपवण्याचे प्रयत्न  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काॅंग्रेसला मोठा धक्का
  • ज्येष्ठ नेते गुलाब नवी आझाद यांचा राजीनामा
  • माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा घरचा आहेर

मुंबई : काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाची गळती अजूनही सुरूच आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याने काँग्रेस पुन्हा एकदा हादरली आहे. आझाद यांच्या राजीनाम्याची चर्चा संपताच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक आरोप केले. (Former Union Minister Prithviraj Chavan targeted the Gandhi family.)

अधिक वाचा : Ulhasnagar : शाळेत जाण्याऐवजी मित्रांसोबत नदीवर आंघोळीसाठी गेला आणि ...

काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी झी २४ तासला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली.  काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाच्या राजीनाम्याबाबत विचारले असता चव्हाण यांनी या ज्येष्ठ राजकारण्याचे जाणे दुर्दैवी असल्याचे म्हटले. ते म्हणाले की आझाद हे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते आणि धर्मनिरपेक्ष चेहरा आहेत. 

'G23' असंतुष्ट गटाचा भाग असलेल्या चव्हाण यांनी ऑगस्ट 2020 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काॅंग्रेस पक्ष संघटनेत अंतर्गत सुधारणा करण्याची मागणी केली होती.

अधिक वाचा : Nitesh Rane : नितेश राणे झाले आक्रमक, मुंबई पालिका आयुक्तांकडे ही मोठी मागणी 

"आम्ही महाविकास आघाडीतील सर्वात लहान पक्ष होतो आणि महाराष्ट्राने यापूर्वी कधीही तीन पक्षांचे सरकार पाहिले नव्हते. दोन पक्षांचे सरकार चालवताना अनेक अडचणी आल्या आणि त्या मी अनुभवल्या. तीन पक्षांचे सरकार चालवण्याबाबत शंका होत्या. पण निदान आम्ही ते केले. तोच कार्यक्रम आणि प्रयोग केले. "अडीच वर्षे सरकार चांगले चालले," चव्हाण म्हणाले.

अधिक वाचा : Anil Deshmukh: अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले, जे जे रुग्णालयात दाखल

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात चांगला पर्याय न दिल्यास ती "ऐतिहासिक चूक" करेल, असे ते म्हणाले. 2014 पासून केंद्रात सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेससाठी पक्षात स्थिती कायम राहणे चांगले नाही, असे चव्हाण म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी