Dahi Handi 2022 : यंदा दहीहंडी (Dahi Handi 2022) साठी असे निर्बंध नाहीत. सोबतच सरकारनं सार्वजनिक सुट्टी (Holiday) देखील जाहीर केली आहे. मुंबईत (Mumbai) खासकरुन दहीहंडीचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. यंदा गोविंदादेखील जोरदार प्रदर्शन करत गगनचुंबी मनोरे तयार करण्यास सज्ज असतील, कारण त्यांच्या सुरक्षेसाठी मनसे (MNS) आणि भाजपनं (BJP) विम्याचे सुरक्षा कवच दिलं आहे. दहीहंडीदरम्यान काही वेळा दुर्घटनांमध्ये गोविंदा जखमी किंवा मृत्यूमुखी पडतात. अशा वेळी त्यांच्या परिवाराची अवस्था बिकट होते. या पार्श्वभूमीवर यंदा गोविंदांना विमा सुरक्षा कवच देण्यासाठी मनसे आणि भाजपनं पुढाकार घेतला आहे.
काही दिवसांवर आता दहीहंडी येऊन ठेपली आहे. प्रत्यक्ष दहिकाल्याच्या दिवशी नवी मुंबईतल्या अपघातग्रस्त होणाऱ्या गोविदांना मनसेकडून ‘सुरक्ष कवच’ देऊ केले आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या 1 हजार गोविंदांचा 100 कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदांना किंवा पथकांना कोणताही खर्च करावा लागणार नाहीये.
Read Also :CWG2022 : सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंग मिळवलं पहिलं सुवर्णपदक
दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळा मृत्यूमुखीही पडतात. त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी, यासाठी मनसेने गोविंदासाठी ‘विमा सुरक्षा कवच’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार, गोविंदाच्या अपघाती मृत्यू आल्यास कुटुंबियांना 10 लाख रुपये, कायम स्वरुपी अंपगत्व आल्यास 10 लाख रुपये अपघातामुळे रुग्णालयातील खर्च 1 लाख रुपये असं विमा सुरक्षा कवच मनसेच्यावतीने मिळणार आहे.
Read Also : एकाने पकडली जर्सी, दुसऱ्याने धरला गळा
या योजनेतील विम्याची मुदत 19 ऑगस्टचा पूर्ण दिवस असेल. ‘सुरक्षा कवच’ योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स येथे जमा करावीत, असं आवाहन मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे. या योजनेचा नवी मुंबईतील गोविंदांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मनसेचे नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळेंच्या वतीने करण्यात आलं आहे.
भाजपकडून देखील गोविंदांसाठी 10 लाखांचं विमा कवच देण्यात आलं आहे. दहिहंडीत दरवर्षी अनेक गोविंदा आपले अवयव गमवतात,त्यांची काळजी आपणच केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून गोविंदांसाठी 10 लाखांचा वीमा देण्याचं मुंबई भाजपनं जाहीर केलंय. गोविंदांनी यात सहभाग घ्यावा, असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.