Maharashtra Cabinet decision for farmers: राज्यमंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शिंदे सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अशा शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Maharashtra government announced a subsidy of rs 50 thousand to regular loan repayment farmers)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर म्हटलं, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर परिस्थितीत शासनाने मदत केली होती अशा शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते. पण अशा प्रकारे कुणालाही वगळण्यात येऊ नये असा आम्ही निर्णय घेतला आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास १४ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यासाठी एकूण ६ हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून दिले जाणार आहेत.
अधिक वाचा : Uddhav Thackeray Interview : म्हणून देवेंद्र फडणवीसांचे मुंबईवर प्रेम नाही, उद्धव ठाकरे यांची खरमरीत टीका
यासोबतच वीज ग्राहकांना प्रीपेड आणि स्मार्ट मीटर देण्याची योजना आहे त्यासाठी महावितरणचा ३९ हजार कोटी आणि बेस्टचा ३४६ कोटी रुपये. जवळपास १ कोटी ६६ लाख ग्राहकांना याचा फायदा होईल. स्मार्ट आणि प्रीपेड योजनेमुळे कुठल्याही ग्राहकाकडून मीटर घेण्यासाठी चार्जेस घेतले जाणार नाहीत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : अजित पवार उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.