HSC Exam Maths Paper Leak: 12वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा होणार? शिक्षण मंडळाने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 04, 2023 | 11:16 IST

Maharashtra HSC exam 2023:  बारावीच्या गणित विषयाचा पेपर फुटल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर या प्रकरणी विरोधकांनी सभागृहातही हा विषय उपस्थित केला. आता या प्रकरणी बोर्डाकडून महत्त्वाची अपडेट आली आहे.

Representative Image
HSC Exam Maths Paper Leak: 12वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा होणार? शिक्षण मंडळाने दिली महत्त्वाची माहिती (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा
  • पेपर फुटल्याचा प्रश्न विरोधकांनी सभागृहात केला उपस्थित

Education board clarification on HSC Exam 2023 paper leak: बारावीच्या परीक्षेतील गणिताचा पेपर फुटल्याचं वृत्त समोर आलं आणि एकच खळबळ उडाली. बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरुन प्रश्नपत्रिकाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. या प्रकरणी विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेत सभागृहात सरकारला जाब विचारला. पेपर फुटल्याच्या वृत्तानंतर आता पुन्हा परीक्षा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावर आता शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) स्पष्टीकरण दिलं आहे. 

राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षेअंतर्गत 3 मार्च 2023 रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा : स्वप्नात फळे दिसणे शुभ की अशुभ?

या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी 10.30 नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात 10.30 वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. 2.30 वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

हे पण वाचा : ट्रेनचं वजन किती असतं रे भाऊ?

संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात फिर्याद क्र 0037 अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाच्या सचिव ओक यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी