आदिवासी भागातील प्रश्नावरुन विधानसभेत जोरदार खडाजंगी, आदित्य ठाकरेंच्या 'त्या' विधानावरुन सुधीर मुनगंटीवार आक्रमक

Aaditya Thackeray vs Sudhir Mungantiwar: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून या दिवशी विविध मुद्द्यांवर सभागृहात चर्चा होत आहे. त्याच दरम्यान आदिवासी भागातील प्रश्नांवरुन विधानसभेत जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. 

Maharashtra Monsoon Session sudhir munghantiwar aggressive over aaditya thackeray statement
आदिवासी भागातील प्रश्नावरुन विधानसभेत जोरदार खडाजंगी 
थोडं पण कामाचं
  • पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस
  • आदिवासी भागातील प्रश्नावरुन विधानसभेत जोरदार खडाजंगी
  • कुपोषणाने मृत्यू होतात हे सरकार मान्य करत नाही, सरकार सत्य का नाकारतंय हे कळत नाही - अजित पवार

Sudhir Munghantiwar on Aaditya Thackeray: देशाचा 75वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असताना राज्यातील आदिवासी विभागातील समस्यांवरुन दिलीप वळसे पाटील आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रश्न मांडला. दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी कुपोषणामुळे मृत्यू सुरू असल्याचा प्रश्न उपस्थित केला. या संदर्भात उत्तर देताना मंत्री विजयकुमार गावित यांनी म्हटलं की, कुपोषणामुळे एकही मृत्यू झालेला नाहीये. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, हे वस्तूस्थितीला धरून नाहीये आणि कुपोषणामुळे मृत्यू संदर्भात सत्य समोर आलं पाहिजे. या संदर्भात मंत्र्यांना अद्यापही सुधारित उत्तर द्यायचं असेल तर देऊ शकतात.

त्यानंतर विजयकुमार गावित यांनी पुन्हा म्हटलं, मी उत्तर दिलं आहे त्यात कोणताही बदल नाहीये. ही गोष्ट खरी आहे की, हायकोर्टात पीआयएल दाखल झालेली आहे. पीआयएलमधील मुद्द्यांच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यात विविध आजारांनी मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, मंत्री महोदय अद्यापही सभागृहाची दिशाभूल करत आहेत.

अधिक वाचा : "शिवछत्रपतींची शपथ तुम्हाला..." CM ची शेतकऱ्यांना भावनिक साद

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आदिवासी भागातील समस्यांचा मुद्दा उपस्थित केला. आदित्य ठाकरे म्हणाले, जेव्हा-जेव्हा आपण आदिवासी विभागात जातो तिथे गेल्यावर आपल्याला राजकारणी व्यक्ती म्हणून तिथली परिस्थिती पाहून आपल्याला लाज वाटली पाहिजे. कुपोषण नाहीचय हे सांगितलं जात आहे. आदिवासी समाजाला आपण न्याय देणार आहात की नाही आणि कुपोषणासारख्या महत्त्वाच्या विषयाला आपण उत्तर देणार आहात का, काहीतरी सुधारणार आहात का?

आदित्य ठाकरे यांच्या लाज वाटली पाहिजे या विधानावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या सभागृहाच्या काही प्रथा, परंपरा आहेत. भावनेच्या भरात त्यांनी लाज वाटली पाहिजे हा शब्द उच्चारला आपल्याकडे लाज वाटली पाहिजे हा शब्द असंसदीय शब्दांच्या यादीत आहे. त्यामुळे आपण सन्माननीय सदस्यांना ताकीद द्यावी नाही तर त्यांनी शब्द मागे घ्यावा. ही प्रथा-परंपरा झाली तर उद्या प्रत्येक उत्तरात मागील दोन वर्षांच्या प्रश्नांवर मी म्हणेल, सरकारला लाज वाटली पाहिजी. त्यामुळे हे शब्द उपयोगात आणले जाऊ नयेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी